नवऱ्याच्या दुचाकीवरून उतरून बायकोने विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली.दुचाकीस्वार पती-पत्नी बाहेर जाण्यासाठी निघाले. गावाच्या बाहेर गेल्यानंतर विरावली गावाजवळ पत्नीने पतीला दुचाकी थांबवायला सांगितली आणि तिने जवळच असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे, मात्र पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी पतीनेच तिला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप केला आहेजळगाव जिल्ह्यातील महेलखेडी येथील मुस्कान अल्ताफ तडवी, वय 20 वर्ष, ही दुचाकीने पती अल्ताफ रहमान तडवी, राहणार महेलखेडी, याच्यासोबत दुचाकीवर जात होती. दरम्यान विरवली गावाजवळ शेत गट क्रमांक 57 येथे तिने पतीला दुचाकी थांबवण्यास सांगितले.दुचाकीवरून उतरून तिने विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली. पती अल्ताफ तडवी यांनी आरडाओरडा केला, नागरिकांनी धाव घेत महिलेला विहिरीतून बाहेर काढले. महिलेला वर काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.










