‘गणेश नाईक आणि माझा कोणताही वाद नाही, जे काही आहे ते त्यांच्या…’; आमदार मंदा म्हात्रे स्पष्टच बोलल्या.

 आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, त्यांचे गणेश नाईक यांच्याशी कोणतेही वैयक्तिक मतभेद नाहीत. त्यांचे कार्यकर्तेच वादाचे कारण आहेत. नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्षपदी राजेश पाटील यांच्या नियुक्ती सोहळ्यात त्या बोलल्या. नाईक हे ज्येष्ठ नेते असून, आपण त्यांच्यासोबत काम केले आहे, असे म्हात्रे म्हणाल्या. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. लवकरच दिलजमाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.’माझा आणि गणेश नाईक यांचा कोणताही वैयक्तिक वाद नाही. जे काही आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आहे. त्या आमदार होतील असे सांगणारे आहेत, त्यांच्यामुळे वाद आहे, असे सांगत आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक आणि त्यांच्यात कोणताही वाद नसल्याचे जाहीर केले आहे. नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्षपदी डॉ. राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने त्यांचा सत्कार सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

 

‘गणेश नाईक हे नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते आहेत. माझ्या अगोदरपासून ते राजकारणात आहेत. मी त्यांच्यानंतर आले आहे. ९९ च्या त्यांच्या निवडणुकीत मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. जुन्या कार्यकत्यांना हे माहीत आहे. यामुळेच राजेश पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड जाहीर झाल्यावर मी त्यांना सर्व प्रथम गणेश नाईकांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. त्याची भेट घ्यायला सांगितली’, असे त्या म्हणाल्या.मंत्री गणेश नाईक मंदा म्हात्रे यांच्यातील अबोला जगजाहीर आहे. मात्र मंदा म्हात्रे यांच्या या विधानाने नवी मुंबईत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांच्या या भाषणाची क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. मात्र यानंतर ताई आणि दादा यांच्यात दिलजमाई होणार की काय, अशी चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ‘मलाही पस्तीस वर्षांचा राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. मीही संघटना बांधली. ९५ महिला नगराध्यक्षा निवडून आणल्या आहेत. नवी मुंबई काय आहे हे मला माहीत आहे. आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षाने मला संधी दिली. तीन वेळा मी आमदार म्हणून निवडून आले आहे. हे फक्त माझे नाही, तर प्रत्येक कार्यकत्यांचे आणि भाजपमधील नेत्यांचे यश आहे’ असे त्यांनी सांगितले.पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांना काम करण्याची पूर्ण मोकळीक असणार आहे. यापूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनाही पूर्ण मोकळीक देण्यात आली होती. मात्र त्यांनी त्यांची माणसे नेमून काम करायला सुरुवात केली होती. याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली, मात्र पाटील यांच्यासोबत आपण आहोत, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.