चंद्रपूरमध्ये भाजपमध्ये गटबाजी उघड झाली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे दिसते. जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरात तिरंगा यात्रा काढली. तर, मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात बल्लारपूर शहरात तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. एकाच पक्षाच्या दोन नेत्यांकडून शहरात यात्रा निघाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कार्यकर्त्यांमध्येही दोन गट पडल्याचे चित्र आहे.नाही नाही म्हणता चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे काँग्रेस झाले. ‘ तुझी तंगडी माझ्या हातात माझी तंगडी तुझ्या हातात ‘ असा नेत्यांचा खेळ सुरु असताना जिल्ह्यातील गटागटात विखुरलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांची तंगडी हातात पकडली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार – किशोर जोरगेवार यांच्यात अद्याप ‘ ऑल इज वेल ‘ नाही. याचा साक्षात्कार कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आला. शनिवारी जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली.आज मुनगंटीवार यांच्या मतदार संघातील बल्हारपूर शहरात यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.
कोणाच्या यात्रेत अधिक गर्दी होती याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगणार आहेच. मात्र चंद्रपूर जिल्हातील भाजपवर मुनगंटीवार यांचा असलेल्या प्रभावाला सुरुंग लावण्यात जोरगेवार यांना काही प्रमाणात यश आल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.भाजपच्या जेष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी भाजप पक्षाचे काँग्रेस होऊ देऊ नका, असे जाहीर आव्हान एका कार्यक्रमातून केले होते. त्यांचा आव्हानाला प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र चंद्रपूरात निर्माण झाले आहे.हम साथ साथ है म्हणणारे नेते आता एकत्र दिसत नाहीत. केवळ नेतेच नाहीतर कार्यकर्तेही गटातटा विखूरल्या गेले आहेत. चंद्रपूर जिल्हातील भाजपवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रभाव खीळखीळा करण्याचे कार्य ‘ पवित्र भक्तीभावाने ‘ एका गटाकडून सुरु आहे. याचा प्रत्यय अनेकदा आला.ज्या चंद्रपूर शहरातून मुनगंटीवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उस्तव केले, सांस्कृतिक कार्यक्रमाने राज्याचे लक्ष वेधले, त्या शहराचा लांब राहून आपल्या मतदार संघात ते आता कार्यक्रम आयोजित करीत आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला चंद्रपुरात अभिवादन करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारात शनिवारला पाच किलोमीटर लांबीची तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारतीय सैन्याच्या शौर्य व बलिदानाला यावेळी सलामी दिल्या गेली. या यात्रेत चिमूरचे आमदार बंटी भांगडिया सहभागी झाले होते.मिशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आज बल्लारपूरात तिरंगा यात्रा भारतीय जनता पार्टी तर्फे आयोजित करण्यात आली आहे.बल्लारपूर मुनगंटीवार यांचा मतदात संघात येतेय.एकाच पक्षातील दोन नेत्यांचा पुढाकारातून दोन शहरात यात्रा निघत असल्याने भाजपातील अंतर्गत संघर्षाची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.









