निवडणूक काळात शेतकर्यांचा सातबारा कोरा करु, असे आश्वासन देऊन सत्तेत विराजमान झालेल्या राज्यातील महायुती सरकारला शेतकर्यांच्या वेदनांचा विसर पडला आहे. राज्यातील शेतकरी कर्ज मुक्त व्हावा, यासाठी किसान ब्रिगेडने सुरु केलेले ( कर्ज मुक्ती अभियानाला खामगाव येथील शेतकर्यांनी प्रतिसाद दिला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेतकर्यांनी दि.१४ मे रोजी तहसील कार्यालयात कर्ज माफिचे अर्ज भरुन निवेदन दिले.










