जळगावात एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या डोक्यावरुन त्याच्या वडिलांचं छत्र लहानपणीच हिरावल्या गेलं होतं. तर, काही दिवसांपूर्वी त्याची आई देखील गेली.आई-वडिलांचे छत्र सर्वांना हवेसे वाटणारे असते. घराला घरपण देणारी एक गोष्ट म्हणजे आई -वडील असतात. मात्र, हे सुख सर्वांच्याच नशिबी येते असं नाही. जळगावातील एका तरुणाची ही कहाणी तुमच्याही डोळ्यात पाणी आणेल. एका अपघातात अजय चौधरी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची जी कहाणी समोर आली त्याने जळगाव हळहळलं आहे.
अजय चौधरी लहान असतानाच त्याच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. त्याने वडिलांचं प्रेम काय असतं, त्यांचा आधार काय असतो हे अनुभवण्यापूर्वीच नियतीने त्याच्यापासून त्याचे बाबा हिरावून घेतले. त्याला त्याच्या आईनेच सांभाळ करत लहानाचं मोठं केले. आईची तब्येत खालावल्याने दहा महिन्यांपूर्वी त्याच्या आईचाही मृत्यू झाला. त्याच्या दहा महिन्यातच आता अजयनेही जगाचा निरोप घेतला आहे.आई खूप आजारी होती, म्हणून अजयला नोकरी देखील करता आली नाही. तो नेहमी आपल्या आईच्या सेवेसाठी हजर राहायचा. ना तो कुठेही जायचा नाही. मात्र, दहा महिन्यांपूर्वी त्याच्या आईचा मृत्यू झाला.11 मे रोजी अजय आणि त्याचा मित्र गणेश गीते हे दोघेही नाचनखेडा येथून लोहारा येथे मित्रासह दुचाकी वर जायला निघाले होते.









