जालन्यातील बदनापूर शहरात दिवसाढवळ्या बाप-लेकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. अशोक आणि यश अंबिलडगे या दोघांची हत्या पैशाच्या देवाणघेवाणीतून झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी मृताच्या सख्ख्या भावाला ताब्यात घेतले असून, जालना शहरातून काही नातेवाईक आले असल्याची माहिती आहे.जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात भर दिवसा बाप लेकाचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील गुन्हेगारीचा उच्चांक मांडला आहे. जालना जिल्ह्यात सतत खून, लूटमार या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सतत पोलिसांवर टीका केली जाते. जालना शहरात नेमके काय चालले अशा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. दोन दिवसांपूर्वी भोकरदन नाक्यावरील घटनेला काही दिवस होत नाही तोच ही घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.










