लातूर विभागीय मंडळातील 1839 शाळांपैकी एकूण 446 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अर्थात 446 शाळांमधील सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा निकाल 92.77 टक्के इतका लागला आहे. लातूर विभागात यंदाही मुलींनीच बाजी मारली. या निकालाचं (Maharashtra SSC 2025 result) एक अनोखं वैशिष्ट्यं पाहायला मिळालं आहे.इयत्ता दहावीच्या परीक्षेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.49 टक्के इतके असून, मुलांचे प्रमाण 90.47 टक्के इतके आहे. लातूर मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांमध्ये धाराशिव जिल्ह्याचा निकाल 95.37 टक्के, लातूर जिल्ह्याचा 92.36 टक्के आणि नांदेड जिल्ह्याचा 91.93 टक्के इतका लागला आहे.










