अजित पवार, भरणेमामा आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची कारखान्याला आवश्यकता आहे, म्हणूनच आपण माघार घेत हा निर्णय घेतला. मी आता आजपासूनच या पॅनेलचा प्रचार करणार आहे असे तुकाराम काळे यांनी सांगितले.छत्रपती सहकारी कारखान्याची निवडणूक मध्यावर असतानाच भाजपच्या नेतृत्वाखालील ‘छत्रपती बचाव’ पॅनलला पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. इंदापूरचे पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम काळे यांनी पॅनलमधून माघार घेत थेट ‘जय भवानी माता’ पॅनलला पाठिंबा दिला आहे. “आपण जय भवानी माता पॅनलचा प्रचार करणार असून माझ्या नावापुढे शिक्क्यावर मतदान करू नये” असे आवाहन त्यांनी केले आहे.
आज सकाळी बारामतीतील नटराज नाट्य कला मंदिरात येऊन तुकाराम काळे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी पॅनलचे प्रमुख व कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पॅनलचे समन्वयक किरण गुजर यांच्यासह सनसरचे माजी सरपंच राहुल काळे, अशोक काळे, विक्रांत सरक, वकील प्रदीप थोरात, विलास खटके यांच्यासह इतर उपस्थित होते.यावेळी जाचक यांनी तुकाराम काळे यांच्या पाठिंब्यामुळे आमचा पॅनल आणखी भक्कम झाला असून, आमचे आठ उमेदवार निवडून आलेच आहेत, इतरही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा आपल्याला विश्वास असल्याचे मत पृथ्वीराज जाचक यांनी व्यक्त केले.तुकाराम काळे यांनी बोलताना मी दादांचा माणूस आहे, छत्रपती कारखाना अत्यंत अडचणीतून जात आहे.
अशा वेळी आपण वेगळे काही करायला नको, त्यामुळे अजित पवार, भरणेमामा आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची कारखान्याला आवश्यकता आहे, म्हणूनच आपण माघार घेत हा निर्णय घेतला. मी आता आजपासूनच या पॅनेलचा प्रचार करणार आहे असे त्यांनी सांगितले.छत्रपती कारखान्याची निवडणूक तशी काहीशी एकतर्फी झाली असून, छत्रपती बचाव पॅनलला पूर्ण ठिकाणी उमेदवारही मिळालेले नाहीत. तर आता हळूहळू एक एक उमेदवार या पॅनलची साथ सोडत आहेत.दरम्यान, छत्रपती सहकारी कारखान्याच्या 21 जागांसाठी तब्बल 600 हून अधिक जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतीला चारशेहून अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या.









