वादग्रस्त विधानांचा ‘बेताज बादशहा’; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची जगभरातून खिल्ली.

 असिफ गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानच्या राजकारणात असून, आजवर त्यांनी मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मात्र, अलीकडील काही वर्षांत त्यांची ओळख केवळ वादग्रस्त विधानांपुरतीच मर्यादित राहिली आहे.‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांची बुधवारी दिवसभरातील वक्तव्ये जगभर चर्चेचा विषय ठरली आहेत. भारताची तीन लढाऊ विमाने पाडल्याचा पुरावा म्हणून सोशल मीडियाचा दाखला देण्यापासून ते दहशतवादी संघटनांना पाकिस्तानचा पूर्वीचा पाठिंबा मान्य करण्यापर्यंत त्यांनी केलेल्या विधानांमुळे पाकिस्तानच्या दाव्यांतील हवा पुरती निघून गेली आहे.असिफ गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानच्या राजकारणात असून, आजवर त्यांनी मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मात्र, अलीकडील काही वर्षांत त्यांची ओळख केवळ वादग्रस्त विधानांपुरतीच मर्यादित राहिली आहे.

ही मुलाखत क्षणार्धातच सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि ‘एक्स’वर आसिफ यांच्यावर जगभरातून टीका सुरू झाली. भारतीय विमाने पाडल्याचा पुरावा म्हणून सोशल मीडियातील कंटेंटवर अवलंबून राहण्च्या असिफ यांच्या वृत्तीची ‘एक्स’वर यथेच्छ खिल्ली उडविण्यात आली. ‘हे संरक्षणमंत्र्यांचे विधान आहे का? पाकिस्तान हा गंभीर देश वाटत नाही,’ अशा आशयाची टिप्पणी एका यूजरने केली.भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर ‘सीएनएन’ वरील मुलाखतीत ख्वाजा आसिफ सहभागी झाले. मात्र, ही मुलाखत त्यांच्यासाठी अत्यंत अवमानजनक ठरली. मुलाखतीदरम्यान, अँकर बेकी अँडरसन यांनी पाकिस्तानने भारताची पान लढाऊ विमाने पाडल्याच्या दाव्यावर प्रश्न विचारला. ‘पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. मात्र, भारताकडे त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. आपण ही विमाने पाडल्याचा कोणता ठोस पुरावा देऊ शकता का,’ असा थेट प्रश्न असिफ यांना करण्यात आला.’हे सगळं सोशल मीडियावर आहे; भारतीय विमानांचे अवशेष पाकिस्तानात पडल्याचे भारतीय माध्यमांनी दाखवले आहे,’ असे विधान असिफ यांनी दिले. त्यांचे उत्तर पूर्ण होण्यापूर्वीच अँडरसन यांनी त्यांना थांबवत चांगलेच सुनावले. ‘आपण पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आहात. सोशल मीडियावर पसरलेल्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी नाही; तर खरी माहिती मिळविण्यासाठी आम्ही आपल्याशी संवाद साधत आहोत,’ असे सुनावून अँडरसन यांनी मुलाखत थांबवली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.