ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी निघालेल्या पाकिस्तानला भारतीय सैन्यानं जोरदार दणका दिला आहे. भारताच्या १५ शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला.नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी निघालेल्या पाकिस्तानला भारतीय सैन्यानं जोरदार दणका दिला आहे. भारताच्या १५ शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला. पण भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेनं पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पडले. भारतानं प्रथमच एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर केला. ही यंत्रणा भारतासाठी गेमचेंजर ठरली आहे. तर दुसरीकडे भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.ऑपरेशन सिंदूरनं हादरलेल्या पाकिस्ताननं प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्ताननं भारताच्या १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण भारतीय सैन्यानं हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. अवंतीपूर, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, कपुरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदिगढ, नाल, फलौदी, उत्तर लाई, भुजमध्ये हल्ल्याचे प्रयत्न झाले. पण भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरवले. भारतानं तैनात केलेली एस-४०० यंत्रणा १५ शहरांसाठी अक्षरश: वरदान ठरली.










