सर्व मित्र पास झाले, मीच नापास; नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्याने वाढदिवशीच संपवलं जीवन.

 बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्यांने वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता आमगाव येथे घडली.बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्यांने वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता आमगाव येथे घडली. क्रिष्णा धर्मराज शिवणकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार क्रिष्णा शिवणकर हा आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. यावर्षी त्याने बारावीची परीक्षा दिली. ५ मे रोजी निकाल जाहीर झाला. यात क्रिष्णा नापास झाला. आपले सर्व मित्र पास झाले, मीच नापास झालो यातून त्याला नैराश्य आले. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तो नाराज असल्याचे बोलल्या जाते. बुधवारी ७ मे रोजी क्रिष्णाचा वाढदिवस होता.

पुन्हा चांगला अभ्यास कर आणि पास हो असे प्रोत्साहन त्याच्या आई-वडिलांनी दिले. मात्र क्रिष्णाच्या मनात काही वेगळेच सुरू होते. घरी कुणीही नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे आईवडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे. धर्मराज शिवणकर यांचे आमगाव येथे छोटे हॉटेल आहे. सुट्टीच्या दिवसात क्रिष्णा वडिलांना मदत करायचा. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपले सगळे लक्ष इंजिनीअरिंग किंवा मेडिकलच्या प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण करण्यावर केंद्रित केल्याने बारावीच्या शालांत परीक्षांना दुय्यम स्थान मिळाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून शालांत परीक्षांमधील सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांच्या एकंदर गुणांमध्ये घट झाली आहे. सोमवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये, नागपूर विभागात कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी विभागातील टॉपर म्हणून स्थान मिळविले. एकंदर निकालातही सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांना तुलनेने कमी गुण मिळाले असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या लेखी शालांत परीक्षेचे महत्व कमी झाल्यामुळे तेथील कामगिरीही खालावली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.