भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप लोकांच्या नरसंहाराचा बदला आज घेण्यात आला. या यशस्वी ऑपरेशननंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अनेक देशांतील समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) मधून चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप लोकांच्या नरसंहाराचा बदला आज घेण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी स्थळं बेचिराख केली आहेत. विशेष म्हणजे दहशतवादाचे स्थळांना उद्धवस्त करुन पाकिस्तानला मोठा हादरा दिला आहे. या यशस्वी ऑपरेशननंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अनेक देशांतील समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे.
डोवाल यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार तथा परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, युकेचे सल्लागार जोनाथन पॉवेल, सौदी अरेबियाचे सल्लागार मुसैद अल ऐबन, संयुक्त अरब अमिरातीचे सल्लागार शेख तहनून आणि महासचिव अली अल शम्सी आणि जपानचे सल्लागार मसाटाका ओकानो यांच्याशी संवाद साधला आहे. यासोबतच त्यांनी ऱशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनीही भारताच्या या क्षेपणास्त्र हल्ल्याबद्दल कल्पना दिली आहे.डोवाल यांनी चीनलाही या हल्ल्याबाबत अवगत केले आहे. त्यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री आणि फ्रांसचे राष्ट्रपती इमैनुएल बोने यांच्या राजकीय सल्लागाराशीही संपर्क साधला आणि त्यांना या हल्ल्याबाबत माहिती दिली. यामध्ये अजित डोवाल यांनी समकक्षीय लोकांशी संवाद साधून भारताच्या या धडक कारवाई आणि निष्पन्नतेच्या पद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.भारताने ही धडक कारवाई केल्यानंतर देशवासियांमध्ये अभिमानाची भावना आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या या संयुक्त कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच क्षेपणास्त्र हल्ला झालेल्या काही वेळातच अजित डोवाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली. डोवाल यांनी त्यांना भारताच्या या कारवाईबद्दल सविस्तर माहिती दिली. अमेरिकेतली भारतीय दुतावासाने यासंदर्भात माहिती दिली आहे.दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी भारतासोबतच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराशीही संवाद साधला. यावेळी रुबियो यांनी दोन्ही देशांतील संवादाचे रस्ते खुले ठेवण्यास सांगितले आणि यावरुन तणाव वाढू न देण्यासही प्राधान्य देण्याचे सांगितले आहे.









