पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने अत्यंत समाधानी असल्याची भावना व्यक्त केली आहे. जिथून आतंकवादी निघतात, त्या 9 जागांना टार्गेट केलेलं आहे, अशाच आणखी कारवाया व्हाव्यात ही इच्छा त्याने बोलून दाखवलीभारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं वृत्त आहे. भारताने राबवलेल्या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आल्याने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली आहे. पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवली येथील संजय लेले यांच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.










