ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान भेदरला, LoC वर अंदाधुंद फायरिंग, 3 भारतीयांचा मृत्यू, सेनेकडून चोख प्रत्युत्तर.

भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा एलओसीवर गोळीबार केला. यामध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे.नवी दिल्ली: भारताने पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तान आता अस्वस्थ झाला आहे आणि त्याने पुन्हा एकदा भारतीयांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १३-१४ दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत सिझफायरचं उल्लंघन केलं जात आहे. तर, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा एलओसीवर गोळीबार केला. या गोळीबारात ३ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.पाकिस्तानच्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुंछ जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

सध्याची परिस्थिती पाहता, जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आज बंद राहतील, असे आदेश जारी करण्यात आले आहेत, तशी माहिती जम्मूच्या विभागीय आयुक्तांनी दिली.भारताने पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर रावबलं. या कारवाईने भेदरलेल्या पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पुन्हा गोळीबार केला. 7 मे च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने LOC वर सीमा ओलांडून अंदाधुंद गोळीबार केला. या अंदाधुंद गोळीबारात तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशापासूनच पाकिस्तान सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे, याला भारताकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे.पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली होती. यासोबतच, भारत पाकिस्तानच्या कृतींना प्रत्युत्तर देईल आणि दहशतवादाविरुद्ध कारवाई करेल, असंही सांगितलं होतं. 22 एप्रिलला काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने 7 मे 1:30 वाजता पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात पाकिस्तानच्या 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, जे दहशतवाद्यांचे गढ होते. भारतीय सेनेने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.