मनोरंजन क्षेत्राने भारताची मान उंचावली,वेव्ह 2025 कार्यक्रमात मान्यवरांचा सूर जळगाव दि. 5 दृकश्राव्य आणि मनोरंजन क्षेत्र यांनी जागतिक स्तरावर भारताला मानाचे स्थान मिळवून दिल आहे. महाराष्ट्र राज्याचा वाटा सगळ्यात मोठा आहे.परिवर्तन संस्था नेहमीच उत्कृष्ट सांस्कृतिक कार्य करत असते. महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम देखील परिवर्तन ने उत्कृष्ट सादर केला आहे अशी भावना खासदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केली. तर महाराष्ट्राला लोक परंपरा संगीत नृत्य नाटक यासोबतच सिने उद्योग यामुळे महाराष्ट्र आघाडीचे राज्य आहे, असे उद्गार आमदार राजूमामा भोळे यांनी काढले. जळगाव येथे गंधे सभागृहात सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “ध्वनी चित्र तरंग” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.










