पाकिस्तानची आर्थिक दुर्दशा! भारताशी पंगा महागात​; युद्ध झाल्यास भिकेला लागणार, कोणी इशारा दिला?

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर पाकिस्तान नष्ट होईल. यामुळे पाकिस्तानला पाई-पाईसाठी संघर्ष करावा लागू शकतो, असा इशारा मूडीज रेटिंग्जने दिला आहे.नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर शत्रू देशांमधील संबंध अलीकडच्या पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर आणखी ताणले गेले आहे. परिस्थितीत अशी आहे की आता दोन्ही देश संभाव्य युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. भारत कधीही आपल्यावर हल्ला करू शकतं अशी भीती पाकिस्तानने व्यक्त केली आहे तर, मूडीज रेटिंग्जकडून एक अहवाल आला आहे ज्यामुळे पाकिस्तानची चिंता आणखी वाढू शकते.भारताशी युद्ध पाकिस्तानला परवडणार नाही… मूडीजने अलीकडेच जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला तर पाकिस्तानची प्रगती थांबू शकते. यामुळे पाकिस्तान सरकारच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नांमध्येही अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणेज, पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी जास्त वेळ लागेल.

मूडीजने पुढे म्हटले की तणाव वाढला तर पाकिस्तानला इतर देशांकडून आर्थिक मदत मिळवण्यात अडचण होऊ शकते. यामुळे पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावरही दबाव वाढेल. सध्या सरकारी तिजोरीत शिल्लक परकीय चलन पुढील काही वर्षांत कर्ज फेडण्यासाठी पुरेसे नाही. एकीकडे पाकिस्तानकडे सध्या सुमारे 15 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा शिल्लक आहे तर भारताकडे $688 अब्ज पेक्षा जास्त राखीव निधी आहे.भारताशी युद्ध झाल्यास… पाकिस्तानला इशारा मूडीजच्या अहवालानुसार पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारत असून हळूहळू विकासाची गाडी प्रगतीपथावर परतत आहे.

या दरम्यान महागाई कमी होऊन परकीय चलन साठा देखील वाढत आहे, जे सगळं IMG (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) कार्यक्रमामुळे घडत आहे. दुसरीकडे, भारताची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील असेही अहवालात म्हटले आहे. भारतातील विकास दर चांगला आहे, सरकारी गुंतवणूक मजबूत आहे आणि लोकही भरपूर खर्च करत आहेत.अशाप्रकारे, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला तर त्याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही. कारण भारताचा पाकिस्तानशी व्यापार खूपच कमी आहे. 2024 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीपैकी 0.5% पेक्षा कमी निर्यात पाकिस्तानला जाईल. पण, भारताने संरक्षणावर जास्त खर्च केला तर त्याचा त्याच्या आर्थिक स्थितीवर काही परिणाम होऊ शकतो आणि आर्थिक सुधारणांचा वेग मंदावू शकतो.पाकिस्तानची अर्थव्यवस्था कमकुवत असून भारतासोबत युद्ध करू शकत नाही. अलीकडेच पाकिस्तान दिवाळखोरीतून थोडक्यात बचावला आणि अजूनही त्याच्यापासून सुटका झालेली नसून करोनानंतर अर्थव्यवस्था कोलमडली. आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे पण, देश अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली आहे. भारतासोबतचे युद्ध, जरी लहान आणि मर्यादित असले तरी, पाकिस्तानची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करेल.लष्करी संघर्ष पाकिस्तानसाठी आत्मघातकी ठरेल, असे IMF ने म्हटले. अशा आर्थिक परिस्थितीत, जेव्हा पाकिस्तान सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे आणि IMF च्या आवश्यकतांनुसार सुधारणा लागू करण्यासाठी संघर्ष करत असतो, तेव्हा लष्करी संघर्ष पाकिस्तानसाठी आत्महत्येसारखाच असेल.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.