‘युद्धाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात टंगळ-मंगळ करत फिरतात’; संजय राऊत यांचं टीकास्त्र.

काश्मीरमधील हल्ल्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदी प्रचारसभांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. युद्धाच्या चर्चेदरम्यान मोदी अदानींसोबत दिसल्याने राऊत यांनी दुजाभाव दर्शवला. गृहमंत्र्यांच्या ‘घरात घुसून मारू’ या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. शहांच्या राजीनाम्याची मागणी राऊत यांनी केली. सरकारने ठोस पाऊल उचलावे, असेही ते म्हणाले.काश्मीरच्या पेहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवर हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये घडलेल्या भीषण हत्याकांडानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र प्रचारसभांमध्ये रमले आहेत,” अशी तीव्र टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली.“देशात युद्धाची चर्चा सुरु आहे, पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा केली जात आहे, पण मोदी सरकारच्या कृतीत मात्र गांभीर्याचा अभाव दिसतो. एकीकडे राष्ट्रीय मीडिया युद्धाचे ढोल वाजवत आहे, तर दुसरीकडे मोदी सेलिब्रिटींसोबत मुंबईत उपस्थित राहतात.

गौतम अदानी यांच्या कार्यक्रमाला जातात, मिठ्या मारतात. हा दुजाभाव का?” असं म्हणत संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.“गृहमंत्री अमित शहा यांनी ‘घरात घुसून मारू’, ‘चुन चुनके मारेंगे’ अशी भाषा केली होती, पण आज काश्मीरमध्ये झालेल्या हत्याकांडानंतरही कुठले ठोस पाऊल सरकारकडून दिसलेले नाही. अमित शहा यांना जबाबदार धरले पाहिजे, आणि विरोधी पक्षांनी त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे”, असंही संजय राऊत म्हणाले.अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अमित शहा चालवतात. शरद पवार जाणार आहे का नाही हे मला माहिती नाही. महाराष्ट्राशी गद्दारी केलेल्यांच्या कार्यक्रमाला का जायचं. आम्ही अमित शहाच्या पक्षाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत… उद्धव ठाकरे परदेशात असो किंवा मुंबईत आम्ही जाण्याचा प्रश्नच येत नाही. भाजप सोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही, हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर भाजपचे मुख्यमंत्री होते हे कदाचित भविष्यात होईल, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.घरात घुस मारू ही भाषा केली अमित शहा म्हणाले चून चूनके मारेंगे, अडवले कोणी आहे. काश्मीर मधल्या प्रत्येक हत्याकांडाला फक्त अमित शहाच जबाबदार आहेत. मोदींनी तरी त्यांना त्या पदावर का ठेवल हे रहस्य आहे. विरोधी पक्षाविषयी मला कीव येते त्यांनी सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा मागेला पाहिजे, पाठिंबा कसा देत आहे, असा सवाल करत विरोधकांवर निशाणा साधला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.