जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या तपासात एनआयएला (NIA) संशय खेचर चालकांवर आहे. हल्लेखोरांना त्यांनी मदत केली असावी, असा संशय आहे. सुमारे दोन हजार खेचर चालकांची चौकशी झाली आहे. दहशतवादी कोणत्या मार्गाने आले, याचा तपास सुरू आहे.पहलगाम : जम्मू काश्मीरच्या पहलगामवर झालेल्या हल्ल्यानंतर देशात संतापाचे वातावरण बघायला मिळाले. बैसरन व्हॅलीमध्ये २७ हिंदू पर्यटकांना टार्गेट करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच अमित शहा यांनी जम्मू काश्मीरकडे धाव घेतली. हे दहशतवादी पाकिस्तानातून आल्याचे स्पष्ट झाल्यावर भारताने आक्रमक भूमिका घेतली. लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय. पाकिस्तान विरोधात भारताने कडक भूमिका घेतलीये. पाकिस्तानचे अनेक मंत्री भडकावू विधाने देखील करत आहेत.










