पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांत युद्ध होण्याची शक्यता दिवसागणिक वाढत आहे. सीमेवर तणावाची परिस्थिती आहे.इस्लामाबाद: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांत युद्ध होण्याची शक्यता दिवसागणिक वाढत आहे. सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश असल्यानं त्यांच्यातील तणाव जागतिक चिंतेचा विषय आहे. अण्वस्त्रांचा वापर न करण्याची भारताची भूमिका आहे. तर पाकिस्तान सरकारकडून सातत्यानं अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आमच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाल्यास अण्वस्त्रांचा वापर करु, अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी काही दिवसांपूर्वीच दिली आहे. पाकिस्तान सरकारमधील आणखी एक मंत्री हनीफ अब्बासी यांनीदेखील अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे.










