काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने अद्याप पाकिस्तानविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई केलेली नाही पण, आपल्या शत्रू देशावरील राजकीय आणि आर्थिक दबाव सतत वाढत आहे. याचा दिशेने आता भारत सरकार पुन्हा एकदा दुतर्फा कारवाईची तयारी सुरू आहे.नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अद्याप पाकिस्तानविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई केलेली नसली तरी, आर्थिक शस्त्राद्वारे शत्रू शेजाऱ्यावर सतत हल्लाबोल करत आहे. आधी सिंधू पाणी करार आणि द्विपक्षीय व्यापार थांबवून मोठा आर्थिक धक्का दिला तर आता पाकिस्तानला दोन्ही बाजूंने घेरण्याची तयारी सुरू आहे. मोदी सरकारचा हा निर्णय योग्य ठरला तर पाकिस्तानसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का ठरेल आणि शत्रू देश अक्षरशः गुडघ्यावर येईल. भारताकडून आता पाकिस्तानची होणार दुहेरी कोंडी द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, यावेळी भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि वित्तीय कृती कार्य दल (FATF) कडे धाव घेतली आहे. IMF कडून पाकिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवण्याचा आणि पाकिस्तानला एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याचा भारताचा हेतू आहे.










