जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी गटाने यापूर्वी गंदेरबलमध्ये गैर-काश्मिरी लोकांवर हल्ला केला होता.सरकारने दोषींना पकडण्याचे काम सुरू केले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करत आहे. लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय.पहलगाम : पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी २७ पर्यटकांचा जीव घेतला. हेच नाही तर धर्म विचारून धाडधाड गोळ्या झाडण्यात आल्या. या दहशतवाद्यांचा शोध हा लष्कराकडून घेतला जातोय. पहलगामवरील हल्ल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड असा संताप दिसतोय. दहशतवादाला मुळापासून दूर करण्याची मागणी केली जातंय. हेच नाही तर हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारताने कडक करवाई केल्याचेही बघायला मिळतंय.
पहलगामवरील हल्ल्यानंतर धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात वापरले गेलेले दहशतवादी मॉड्यूल आणि 2024 मध्ये गंदेरबल जिल्ह्यात गैर-काश्मिरी लोकांवर झालेल्या हल्ल्यात साम्य आहे. या हल्ल्यात सोनमर्ग येथील बोगदा प्रकल्पात काम करणाऱ्या सहा मजूर आणि एका डॉक्टरची हत्या करण्यात आली होती. दोन्ही हल्ले लष्कर-ए-तैयबा या संघटनेने घडवले असल्याचा संशय आहे.हैराण करणारे म्हणजे पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या काही दहशतवाद्यांनी यापूर्वी बोगद्यातील मजुरांवर हल्ला केला होता, अशी माहिती समोर येत आहे. या हल्ल्यातील एका दहशतवाद्याची ओळख जुनैद अहमद भट्ट अशी पटली देखील होती. सुरक्षा दलांनी त्याला डिसेंबरमध्ये मारले. रिपोर्टनुसार, पहलगाम हल्ल्यात हाशिम मूसा नावाचा व्यक्ती सहभागी आहे.









