भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थितीत पाकिस्तान लष्करप्रमुखांनी पुन्हा ओकली गरळ, भारताला थेट अल्टिमेटम.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी गुरुवारी पुन्हा भारताला इशारा दिला आहे. त्यांनी भारताविरोधात गरळ ओकली असून आक्रमक भूमिका घेतली आहे.पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी गुरुवारी पुन्हा भारताला इशारा दिला की, भारताच्या कोणत्याही ‘लष्करी साहसाला’ ‘त्वरित, दृढ आणि कडक प्रत्युत्तर’ देण्यात येईल. सशस्त्र दलांनी आयोजित केलेल्या फील्ड ट्रेनिंग सरावाचे साक्षीदार होण्यासाठी मुनीर ‘फायरिंग रेंज’मध्ये आले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि नवी दिल्लीकडून प्रत्युत्तराची इस्लामाबाद सैन्याला भीती असताना त्यांचे हे विधान समोर आले आहे. यापूर्वी मुनीर यांच्या पाकिस्तानमधील उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते.

‘भारताच्या कोणत्याही लष्करी चुकीच्या कृतीला जलद, ठाम आणि जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल यात कोणतीही संदिग्धता नसावी,’ असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानची सरकारी वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान (एपीपी) यासंदर्भातील वृत्त दिले आहे. ‘पाकिस्तान प्रादेशिक शांततेसाठी वचनबद्ध असला तरी, आम्ही राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यास पूर्णपणे तयार आहोत,’ असे मुनीर यांनी टिल्ला फील्ड फायरिंग रेंज (TFFR) येथे सैनिकांना संबोधित करताना म्हटले आहे.लष्कर मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने जारी केलेल्या प्रेस रिलीजचा हवाला देत एपीपीने वृत्त दिले आहे की, जनरल मुनीर यांनी ‘हॅमर स्ट्राइक’ सराव पाहण्यासाठी टीएफएफआरला भेट दिली आहे.

युद्धाच्या परिस्थितीत लढाऊ तयारी, युद्धभूमीतील समन्वय आणि अत्याधुनिक शस्त्र प्रणालींचे ऑपरेशन प्रमाणित करणे हे या सरावाचे उद्दिष्ट असल्याचे त्यात म्हटले आहे.इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) च्या निवेदनानुसार, मुनीर म्हणाले, ‘पाकिस्तानला प्रादेशिक शांतता हवी आहे, परंतु राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आमची तयारी आणि वचनबद्धता अटळ आहे.’ भारताच्या कारवाईच्या शक्यतेमुळे पुढील ३६ तास महत्त्वाचे असतील, असे पाकिस्तानने बुधवारी म्हटले होते. तथापि, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांना संयम बाळगण्याचे आणि तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.