‘देश सृजनतेचा स्रोत’, जगाची क्रिएटिव्ह सुपरपॉवर म्हणून भारत सज्ज; ‘वेव्ह्ज २०२५’ परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान मोदींचे उद्गार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एण्टरटेन्मेंट समिट २०२५’ मध्ये भारताच्या सृजनशीलतेवर भर दिला. महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या. भारताला मोठा इतिहास असून, मनोरंजन उद्योगातील उद्योजकांनी भारताकडून सृजननिर्मितीची अपेक्षा ठेवावी, असे ते म्हणाले.‘जग गोष्टी सांगण्याचे नवनवे मार्ग शोधत आहे. यासाठी भारताचा प्राधान्याने विचार व्हायला हवा. भारताला मोठा इतिहास आहे, पौराणिक परंपरा आहे. त्यामुळे भारतात असंख्य गोष्टींचा खजिना आहे. हा खजिना जगासमोर आणायला हवा. त्यासाठी जगभरातील मनोरंजन उद्योगातील उद्योजकांनी भारताकडून केवळ तांत्रिक कौशल्याची अपेक्षा न धरता, सृजननिर्मितीचा स्रोत या दृष्टीने पाहावे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केले.पहिल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एण्टरटेन्मेंट समिट २०२५’ या चार दिवसीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान बोलत होते. त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीतून शुभेच्छा दिला. त्यापाठोपाठ गुजरात दिनानिमित्त गुजरातीतून शुभेच्छा दिल्या. वेव्ह्ज या मनोरंजन उद्योगाच्या प्रदर्शनाच्या संकल्पनेचे त्यांनी कौतुक केले. ‘वेव्ह्ज हा केवळ परिवर्णी शब्द (ॲॅक्रोनिम) नसून ती मनोरंजन उद्योगाची लाट आहे. ही लाट सांस्कृतिक विषयांची (कण्टेण्ट) आहे आणि या लाटेवर प्रत्येक सर्जनशील कलावंत स्वार झाला आहे.सर्जनशील जगात वावरणारे लोक संपूर्ण युगाचे स्वप्न पेरतात, वाढवतात आणि फुलवतात. सृजनाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भारत अनेक आश्चर्यकारक कलाकृती निर्माण करू शकतो,’ असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.देशाच्या परंपरेचा आढावा आधुनिकतेच्या परिप्रेक्ष्यातून त्यांनी घेतला. ‘अभिज्ञान शाकुंतल नाटकामुळे शास्त्रीय नाटकाला वेगळी दिशा मिळाली.

नादब्रह्मातूनच दैवी ध्वनीची कल्पना जगासमोर आली. देवही संगीताने अभिव्यक्त होताना दिसतात. या अशा कल्पनांचा, गोष्टींचा हजारो वर्षांचा खजिना देशात आहे. हा खजिना नव्या रूपात नव्या पिढीसमोर आणण्याची गरज आहे. आज परदेशी प्रेक्षक भारतीय चित्रपट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता जगाने भारतात येऊन, कला-संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालत नवीन आशय-विषय निर्माण करण्याची आवश्यकता आहे,’ असे मोदी म्हणाले. आपल्या या संकल्पनेच्या पुष्टीसाठी त्यांनी ‘क्रिएट इन इंडिया क्रिएट फॉर दि वर्ल्ड’ याचा आग्रह जगभरातून आलेल्या मनोरंजन व माध्यम क्षेत्रातील सर्जनशील व्यक्तींसमोर धरला. ‘पाहण्याचा ‘स्क्रीन’ लहान होत चालला असला, तरी त्यासाठी कल्पना सत्यात उतरवण्याचा ‘स्कोप’ विस्तारत आहे,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.वेव्ह्ज परिषदेत ७५हून अधिक देश सहभागी झाले आहेत. १ ते ४ मे चालणाऱ्या या परिषदेत १००हून अधिक वैचारिक सत्रे होणार आहेत. यामध्ये विचारमंथन, तसेच दिशादर्शन होणार आहे. या परिषदेत सुमारे २०० प्रदर्शक सहभागी झाले आहेत. त्यात आयटी, गेमिंग, चित्रपटनिर्मिती अशा क्षेत्रांतील देशी-विदेशी उद्योजकांचा सहभाग आहे. या उद्घाटनावेळी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव आदी उपस्थित होते.’देशाच्या कानाकोपऱ्यात गोष्टी भरलेल्या असून त्या विश्वबंधुत्व शिकवणाऱ्या आहेत,’ असे रिलायन्स इंजस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना नमूद केले. ‘देशाचा मनोरंजन उद्योग हा केवळ सॉफ्ट पॉवर नाही. तो जगण्याचे बळ देणारा उद्योग आहे. पहलगामनंतरही हा सोहळा घडवून पंतप्रधानांनी सर्वांच्या मनात आशा जागवली आहे. पंतप्रधानांच्या या भविष्यवेधी कृतीला १४५ कोटी नागरिकांचा पाठिंबा आहे,’ असे ते म्हणाले.’जगाची क्रिएटिव्ह सुपरपॉवर म्हणून नेतृत्व करण्यास आज भारत सज्ज झाला आहे. या भारताची मनोरंजन राजधानी मुंबई आहे,’ असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

देवाने या ‘युनिव्हर्स’ ची निर्मिती केली आणि तुम्ही सारे मनोरंजनविश्वातील तंत्रकुशल लोक ‘मेटाव्हर्स’ची निर्मिती करत आहात, अशा शब्दांत त्यांनी उपस्थित उद्योजक व कलावंतांची प्रशंसा केली. मुंबईत सुमारे ५०० एकर जागेवर वसलेल्या फिल्मसिटीमध्ये १२० एकर जागा अॅनिमेशन उद्योगासाठी विकसित केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.तंत्रज्ञानामुळे विषय वापराची पद्धत बदलली आहे, असे सांगून पहिली वेव्हज परिषद महाराष्ट्र स्थापनादिनी होत असल्याबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाधान व्यक्त केले. ‘जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या सर्जनशील लोकांना एकत्र आणण्याचे पंतप्रधानांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. अशी सर्जनशील माणसे एकमेकांशी जोडली जावीत आणि अशी जोडलेली माणसे नंतर गुंतवणूकदारांशी जोडावीत, अशी कल्पना पंतप्रधानांनी मांडली होती. ती या परिषदेच्या निमित्ताने प्रत्यक्षात उतरली आहे,’ असे वैष्णव म्हणाले. सृजनाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भारत अनेक आश्चर्यकारक कलाकृती निर्माण करेल जगाने भारतात येऊन, कला-संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालावा भारतातील असंख्य गोष्टींचा खजिना जगासमोर आणायला हवापहिल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एण्टरटेन्मेंट समिट २०२५’ या चार दिवसीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जनशील जबाबदारी हा मुद्दा आग्रहाने मांडला. ‘कोणतीही सर्जनशील निर्मिती करताना सर्वांनी काही भान बाळगणे आवश्यक आहे. अशी निर्मिती करताना प्रत्येकाने मानवी संवेदना जागरूक ठेवाव्यात. तरुणांना मानवताविरोधी विचारांपासून वाचवावे आणि तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मकतेसाठीच करावा,’ असे आवाहनही मोदी यांनी उपस्थितांना केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.