उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मामीवर प्रेम असल्याने भाच्याने मामाची हत्या केली. मामा सौदी अरेबियातून परत येणार होता. भाच्याला हे आवडले नाही. मित्राच्या मदतीने त्याने मामाला मारण्याचा कट रचला. आरोपींनी मामाला जंगलात नेऊन गोळ्या घातल्या. नंतर डोके दगडाने ठेचले. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याचे उघड झाले आहे.लखनऊ : मामीच्या प्रेमात वेडापिशा झालेल्या भाच्याने मामाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये घडली आहे. सौदी अरेबियात असलेला मामा परत येऊन संसार थाटणार होता. हे भाच्याला आवडले नाही. त्यामुळे त्याने मित्राच्या मदतीने मामाला जीवे मारण्याचा कट रचला होता.सोमवारी सायंकाळी असरगरपूर गावाच्या जंगलात मालन नदीच्या काठी एका तरुणाला गोळ्या मारल्याची बातमी समोर आली. फारुख असे मृताचे नाव आहे. तो काही काळापूर्वी सौदी अरेबियामधून पैसे कमवून परत आला होता. पोलिसांनी तपास केला. तेव्हा फारुखच्या पत्नीसोबत त्याचा भाचा मेहरबान याचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळेच ही हत्या झाल्याचे उघड झाले.










