शेतकरी म्हणुन आम्हाला योजना द्या जात म्हणुन नाही…
जळगाव आम्ही आपणास या निवेदनाव्दारे कळवु इच्छितो की आम्हा शेतकऱ्यांना योजना देत असताना जात निहाय योजना नको फक्त शेतकरी म्हणुन योजना मिळाव्यात.
भारत हा कृषीप्रधान देश आहे या देशात सर्व कृषी बांधवांना समान दर्जा दिला पाहिजे व शेतीशी निगडीत असलेल्या सर्व योजनांविषयी लाभ मिळणे हा शेतकयांचा अधिकार आहे व तो त्याला मिळायलाच हवा. परंतु शासनाकडुन दिल्या जाणाऱ्या काही योजना विशिष्ट जातींना प्राधान्य न देता सर्व शेतकऱ्यांना प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांना शेतीला जोडव्यवसाय म्हणुन प्रत्येक शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकतो व त्यातुन त्याला चांगल्या प्रमाणात पैसा मिळु शकतो त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास योजनांचा योग्य तो उपयोग होईल.










