बीडच्या ‘आवादा’मधील चोरीचा अखेर छडा, चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

 बीडमधील ‘आवादा’ कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पातून तांबे चोरणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षा रक्षकांना बांधून ही चोरी करण्यात आली होती. पोलिसांनी 11,58,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, खंडणीच्या आरोपानंतर ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आरोपी धाराशिव जिल्ह्यातील आहेत.’आवादा’ कंपनीच्या पनवचक्की प्रकल्पावर सुरक्षारक्षकांना बांधून घालून तेथून तांबे चोरून नेणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ११,५८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आवादा कंपनी चर्चेत असतानाच तिथे चोरीची घटना घडल्याने मोठी खळबळ निर्माण झाली.

सात एप्रिल रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास आवादा कंपनीच्या पवनचक्कीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी चोरी झाली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. शेख यांच्या पथकानेे बबन सरदार शिंदे (रा. नांदूर ता. केज), धनाजी रावजी काळे आणि मोहन हरी काळे (दोघे रा. लक्ष्मी पारधी वस्ती जि. धाराशिव) आणि लालासाहेब सखाराम पवार (रा. दसमेगाव ता. वाशी, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले.आवादा कंपनीतील चोरीच्या प्रकारानंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आली होती. वाल्मिक कराडची टीम अजूनही कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला होता. दुसरीकडे सुरेश धस यांच्याकडून वेगळाच दावा करण्यात आला. आता अखेर पोलिसांनी आवादा कंपनीत चोरी करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मोठा मुद्देमालही जप्त करण्या आलाय. चोरटे हे धाराशिव जिल्हातील असल्याचे स्पष्ट झाले.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आवादा कंपनी चर्चेत आहे. वाल्मिक कराडने दोन कोटींची खंडणी मागितल्याचे आरोप आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जबाव देखील दिला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आहे. बीडमधील अनेक मारहाणीचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरही काही आरोप हे करण्यात आले आहेत. बीड महानगरपालिकेच्या लेखापालला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

  • Related Posts

    महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय; महिला वकिल मारहाण प्रकरणी रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्री फडणविसांना संतप्त सवाल.

    अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला सनगाव येथील सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.मुख्यमंत्री महोदय हे फोटो…

    निवडणुकीत एकट्या कासलेला 10 लाख दिले, मग…; धनंजय मुंडेंच्या आमदारकीविरुद्ध न्यायालयात धाव.

    रणजीत कासले यांना धनंजय मुंडे यांनी ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी दहा लाख रुपये दिल्याच कासले यांनी म्हटले होतेराज्याच्या राजकारणात गेल्या 4 महिन्यांपासून बीड (Beed) जिल्हा केंद्रस्थानी आहे. अगोदर विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार धनजंय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय; महिला वकिल मारहाण प्रकरणी रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्री फडणविसांना संतप्त सवाल.

    महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय; महिला वकिल मारहाण प्रकरणी रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्री फडणविसांना संतप्त सवाल.

    निवडणुकीत एकट्या कासलेला 10 लाख दिले, मग…; धनंजय मुंडेंच्या आमदारकीविरुद्ध न्यायालयात धाव.

    निवडणुकीत एकट्या कासलेला 10 लाख दिले, मग…; धनंजय मुंडेंच्या आमदारकीविरुद्ध न्यायालयात धाव.

    अचानक गाय आडवी आली, ड्रायव्हरने ब्रेक मारताच कार थेट कालव्यात कोसळली, एअर होस्टेसचा करुण अंत.

    अचानक गाय आडवी आली, ड्रायव्हरने ब्रेक मारताच कार थेट कालव्यात कोसळली, एअर होस्टेसचा करुण अंत.

    पोटदुखीनं असह्य वेदना; डॉक्टरांना एक्स रेमध्ये सोन्याचं बिस्किट दिसलं अन् अजब घटनेचा उलगडा.

    पोटदुखीनं असह्य वेदना; डॉक्टरांना एक्स रेमध्ये सोन्याचं बिस्किट दिसलं अन् अजब घटनेचा उलगडा.