जि प शाळा मोहमांडली नवी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

जि प शाळा मोहमांडली नवी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक यांनी महामानव डॉ बाबासाहेब यांच्या जीवन कार्याबद्दल मुलांना माहिती सांगितली. तसेच ग्रामपंचायत सदस्य, युवा स्वयंसेवक, भीम आर्मी चे तालुका उपाध्यक्ष जूम्मा तडवी सर यांनी डॉ. बाबासाहेब यांनी सांगितलेले शिक्षणाचे महत्त्व मुलांना पटवून दिले. तसेच शिक्षक विनोद पाचपोळे सर यांनी बाबासाहेब यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी पण बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक विनोद बाविस्कर सर, भीम आर्मीचे तालुका उपाध्यक्ष तथा युवा ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी सर, शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य, नागरिक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शिक्षक विनोद पाचपोळे सर यांनी व्यक्त केले.

  • Related Posts

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बहुचर्चित गोखले पुलाच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा.

    जूनच्या पहिल्या आठवड्यापासून बीएमसी हा पूल वाहतुकीसाठी खुला करू शकते. ही माहिती बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. शुक्रवारी, बांगर यांनी अंधेरीतील गोखले पूल आणि विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला…

    राज्यात आता ‘नो डिनायल पॉलिसी’; खासगी रुग्णालयाबाबत सरकारचे मोठे निर्णय, अजितदादांची माहिती.

    राज्यातील सर्व खासगी रुग्णालयात ‘उपचार नाकारू नका’ (नो डिनायल पॉलिसी) सक्तीची केली जाणार असल्याचे स्पष्ट करताना तातडीची वैद्यकीय सेवा कोणत्याही रुग्णालयाला नाकारता येणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बहुचर्चित गोखले पुलाच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा.

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बहुचर्चित गोखले पुलाच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा.

    राज्यात आता ‘नो डिनायल पॉलिसी’; खासगी रुग्णालयाबाबत सरकारचे मोठे निर्णय, अजितदादांची माहिती.

    राज्यात आता ‘नो डिनायल पॉलिसी’; खासगी रुग्णालयाबाबत सरकारचे मोठे निर्णय, अजितदादांची माहिती.

    42 वर्ष परदेशात अडकला भारतीय व्यक्ती, अखेर 4 दशकांची प्रतिक्षा संपली, मायदेशात झाले पुनरागमन.

    42 वर्ष परदेशात अडकला भारतीय व्यक्ती, अखेर 4 दशकांची प्रतिक्षा संपली, मायदेशात झाले पुनरागमन.

    भारतातून पाक नागरिकांची परतपाठवणी! एकही पाकिस्तानी राज्यात राहू नये; अमित शहांची मुख्यमंत्र्यांना सूचना.

    भारतातून पाक नागरिकांची परतपाठवणी! एकही पाकिस्तानी राज्यात राहू नये; अमित शहांची मुख्यमंत्र्यांना सूचना.