देवीच्या यात्रेला चौघे गेले, परत येताना अनर्थ घडला; दोन जीवलग मित्रांचा वाटेत अंत, सारं गाव हळहळलं.

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव रस्त्यावर दोन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवीच्या जत्रेतून परत येताना अनर्थ घडला. संपूर्ण गावात घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.दोन मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तुकाई देवीच्या यात्रेतून एकाच दुचाकीने ४ मित्र घराकडे परतत होते. त्याचवेळी आरो प्लांटच्या भिंतीवर दुचाकी धडकल्याने अपघात झाला. दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव रस्त्यावर झाला.आकाश अंबादास वाघ – वय वर्ष १९, राहणार पिंपळगाव घाट ह. मु. आमठाणा तालुका सिल्लोड, विशाल पांडुरंग गायसमिंद्रे – वय वर्ष २४, राहणार आमठाणा अशी अपघातात मृतांची नाव आहे. तर अनिकेत दत्तू जगताप वय १६, रितेश अंबादास साळवे १८ अशी जखमींची नावं आहेत.

दरम्यान या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभई येथे तुकाईदेवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी आकाश, विशाल, रितेश आणि अनिकेत हे चार मित्र दुचाकीने गेले होते. यात्रेत देवीच दर्शन करून एकाच दुचाकीने चौघे घरी परतत होते. ते जांभई गावापासून पुढे आले. मात्र तिथे काही अंतरावर असलेल्या आरो प्लांटच्या भिंतीवर त्यांची दुचाकी धडकली. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने आरो प्लांटच्या भिंतीवर दुचाकी धडकल्याची माहिती आहे. यामध्ये दुचाकी वरील चौघेजण गंभीर जखमी झाले.दरम्यान स्थानिकांनी चौघांना तातडीने सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी आकाश आणि विशाल या दोघांना तपासून मृत घोषित केलं.

तर अनिकेत, रितेश हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या भीषण अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे.आकाश वाघ हा पाच वर्षांचा असताना त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. यामुळे तो अनाथ झाला होता. आमठाणा येथे आकाशची आत्या रेखा खरात या राहतात. आकाशच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या त्याच्या आत्याने त्याचा सांभाळ केला. आई-वडिलांच्या निधनानंतर आकाशचाही मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  • Related Posts

    अजित पवार गटाला ‘दे धक्का’, आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील

    आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाने सर्व 21 जागा मोठ्या फरकाने जिंकत अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा मोठा पराभव केला. जिल्ह्यात एकीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार…

    गायक नेहा सिंह राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

     जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान, पहलगाम हल्ल्याबाबत सोशल मीडियावर मत व्यक्त केल्यानंतर गायक नेहा सिंग राठोड वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे

    भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे

    अजित पवार गटाला ‘दे धक्का’, आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील

    अजित पवार गटाला ‘दे धक्का’, आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील

    गायक नेहा सिंह राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

    गायक नेहा सिंह राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

    पाकिस्तानला दणका, चीनची वाढली चिंता; भारताच्या पॉवरफुल निर्णयानं सागरी समीकरणं बदलली.

    पाकिस्तानला दणका, चीनची वाढली चिंता; भारताच्या पॉवरफुल निर्णयानं सागरी समीकरणं बदलली.