देवाला बकरा देण्यास निघाले, कारला भीषण अपघात; चौघे देवाघरी, पण बकऱ्यालाच देव पावला.

एक कार अनियंत्रित होऊन पुलाचा कठडा तोडून नदीत पडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला.भोपाळ: देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय देणारी घटना मध्य प्रदेशात घडली आहे. एक कार अनियंत्रित होऊन पुलाचा कठडा तोडून नदीत पडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला.मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये दुर्दैवी अपघात घडला. गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास अपघात झाला. अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचं पथक अपघातस्थळी पोहोतलं. कारमधील चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले.

त्यांना उपचारांसाठी जबलपूरमधील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची स्थिती गंभीर आहेत. मात्र ते शुद्धीवर आले आहेत.कारमधून प्रवास करणारे सहा जण त्यांच्यासोबत बकरा घेऊन जात होते. ‘प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार सहा जण देवाला बकऱ्याचा बळी देण्यासाठी निघाले होते. सहाजण एकाच समाजाचे आहेत. या अपघातातून बकरा वाचला आहे,’ अशी माहिती चरगवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक प्यासी यांनी दिली. अपघातातून वाचलेले दोघे अद्याप बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले नाहीत.अपघाताबद्दल अधिकची माहिती मिळवण्यासाठी पोलीस मृतांच्या शवविच्छेदन अहवालाची आणि वाचलेल्या दोघांच्या जबाबाची वाट पाहत आहेत. अपघातानंतर चरगवा पोलीस ठाण्याचं पथक लगेचच पोहोचलं. त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि मृतांना बाहेर काढलं. जखमींना तातडीनं जबलपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.अपघातात मृत पावलेले चौघे चौकीताल गावचे रहिवासी आहेत. किशन पटेल (३५), महेंद्र पटेल (३५), सागर पटेल (१७), राजेंद्र पटेल (३५) अशी मृतांची नावं आहेत. मनोज प्रताप (३५) आणि जितेंद्र पटेल लोधी (३६) या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. तेदेखील चौकीताल गावचे रहिवासी आहेत.

  • Related Posts

    पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

     पुण्यात कोंढवा परिसरात एका घरावर अज्ञात व्यक्तीने एअरगनने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. मनोज कानडे यांच्या घरावर झालेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी तत्परतेने तपास करत बिलाल शेख…

    पाकिस्तानने भारतीयांबाबत घेतला आता मोठा निर्णय, दिली ४८ तासांची मुदत, नाहीतर….

    पाकिस्तानने आता भारतीयांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने भारतीयांना आता ४८ तासांचा अल्टीमेटम नेमका कशासाठी दिला आहे, जाणून घ्या…कराची : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबाबत बरेच निर्णय घेतले आहेत. पण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

    पुण्यात घरावर अचानक गोळीबार, हल्ला की दुसरं काही? पोलिसांनी इसमाच्या मुसक्या आवळल्या.

    पाकिस्तानने भारतीयांबाबत घेतला आता मोठा निर्णय, दिली ४८ तासांची मुदत, नाहीतर….

    पाकिस्तानने भारतीयांबाबत घेतला आता मोठा निर्णय, दिली ४८ तासांची मुदत, नाहीतर….

    अकोला हादरलं! सुशिक्षित कुुटुंबातील १४ वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं, सुसाईड नोट सापडली पण…

    अकोला हादरलं! सुशिक्षित कुुटुंबातील १४ वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं, सुसाईड नोट सापडली पण…

    ज्या शाळेत शिकला, तिथेच IAS म्हणून सत्कार स्वीकारला, जेसीबीतून फुलांची उधळण करत बीडच्या पंकज औटेचे स्वागत.

    ज्या शाळेत शिकला, तिथेच IAS म्हणून सत्कार स्वीकारला, जेसीबीतून फुलांची उधळण करत बीडच्या पंकज औटेचे स्वागत.