शरद पवार हेच आपले ‘दैवत’, अजित पवारांचा पुनरुच्चार, पुन्हा एकत्र येण्याची चर्चा.

 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले असले तरी पक्षाचे संस्थापक शरद पवार हेच आपले दैवत असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. त्यामुळे दोन्ही गट भविष्यात एकत्र येण्याची चर्चा आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले असले तरी पक्षाचे संस्थापक शरद पवार हेच आपले दैवत असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. पिंपरीत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजितदादांनी हे वक्तव्य केले आहे. अण्णा बनसोडेंची मूर्ती लहान पण कीर्ती महान असे म्हणत त्यांचे कौतुक केले.यावेळी अजित पवार म्हणाले, “कालही आम्ही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता लाभला आहे. त्यांनी देशाची मान जगभर उंचावली आहे. त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी हा निर्णय घेतला.

” या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. बुधवारी केलेल्या वक्तव्यानंतर आज गुरूवारी अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात पार पडणार आहे त्यानिमित्ताने पवार कुटुंबीय एकत्रित उपस्थित राहणार आहे. त्यामुळे अजित पवार यांनी टायमिंग साधल्याचेही बोलले जात आहे.अजित पवारांनी जागतिक आर्थिक संकटावरही भाष्य केले. ते म्हणाले, “अमेरिकेने आयात शुल्क वाढवल्याने अनेक देशांवर परिणाम झाला आहे. कोरोनानंतर आता हे नवे संकट समोर आले आहे.

पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेल्या संबंधांचा फायदा भारताला नक्कीच होईल.” त्यांनी कार्यकर्त्यांना तळ्यात-मळ्यात न राहता सक्रिय राहण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी अण्णा बनसोडे यांचा “पानटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष” असा प्रेरणादायी प्रवास अधोरेखित करत त्यांचे कौतुक केले. “आता भान ठेवून वागा आणि बोला, कारण सर्वांचे लक्ष तुमच्यावर आहे,” असेही ते म्हणाले.वाढत्या गुन्हेगारीवरही अजित पवारांनी ठाम भूमिका मांडली. “कोयता गँग, अमुक-तमुक गँग चालणार नाही. कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवा,” असा दम त्यांनी प्रशासनाला भरला. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असताना अजित पवारांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.