KDMC च्या प्रसूतीगृहात गर्भवतीचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप.

कल्याण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रसुतीगृहात उपचारा दरम्यान एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रकरण ऐरणीवर असतानाच कल्याण (Kalyan) शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात शांतीदेवी अखिलेश मौर्य (वय ३०) या महिलेचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. तिची शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालावली. तिला इंजेक्शन दिले गेले. तिला प्रसूतीगृहातून खाजगी रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

धक्कादायक म्हणजे प्रसूती गृह असलेल्या या रुग्णालयात आयसीयु नसल्याचे देखील माहिती समोर आली आहे.केडीएमसीच्या डॉक्टरांनी आम्ही कोणताही हलगर्जीपणा केला नाही, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे सांगितले.माझ्या पत्नी शांती देवी मोर्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी इथे आलो होतो.मला सकाळपासून येथे येऊ दिले नाही. आणि अचानक तीन वाजता शस्त्रक्रिया सुरू केली. मात्र ती शस्त्रक्रिया झालीच नाही. इंजेक्शनमुळे पत्नीचा मृत्यू झाला. मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी इतकीच मागणी मी करू शकतो.दरम्यान दोन महिन्यापूर्वी महापालिकेच्या डाेंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा सरोदे या गरोदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता.

या प्रकरणात दोन डॉक्टरांना महापालिकेने सेवेतून कमी करीत त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.डोंबिवली पश्चिमेकडील मोठगाव येथील रहिवासी सुवर्णा सरोदे यांचे सिझेरियन ऑपरेशन झाले, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. नंतर जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, तिच्या संमतीशिवाय ऑपरेशन दरम्यान तिचे गर्भाशय काढून टाकण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक पातळीवर रुग्णालय आणि तेथील डॉक्टरांच्या विरोधात प्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच हे दुसरी घटना घडली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.