उदंड झाली खाती, पण अधिकार किती? अर्धा डझन मंत्र्यांची नाराजी, CM फडणवीसांकडे तक्रार करणार.

महायुती सरकारमधील राज्यमंत्री नाराज आहेत. उदंड झाली खाती, पण त्या खात्यांमध्ये अधिकार नेमके किती, अशी राज्यमंत्र्यांची अवस्था आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातत ६ राज्यमंत्री आहेत. प्रत्येकाकडे ६ खाती आहेत. पण त्यांना कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकार दिलेले नाहीत.महायुती सरकारमधील राज्यमंत्री नाराज आहेत. उदंड झाली खाती, पण त्या खात्यांमध्ये अधिकार नेमके किती, अशी राज्यमंत्र्यांची अवस्था आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ६ राज्यमंत्री आहेत. प्रत्येकाकडे ६ खाती आहेत. पण त्यांना कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यमंत्रिपद केवळ शोभेपुरतं आणि दाखवण्याकरता असल्याची भावना राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये व्यक्त होत आहे.राज्यमंत्र्यांचाही सन्मान राखला जाईल अशा पद्धतीनं त्यांना अधिकार प्रदान करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकार न दिल्यास, मीच राज्यमंत्र्यांना अधिकार बहाल करेन, असंही फडणवीस म्हणाले होते. त्यानुसार काही कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना कोणकोणते अधिकार दिले याचं परिपत्रक काढलं. त्यातून राज्यमंत्र्यांना अतिशय किरकोळ अधिकार देण्यात आल्याचं स्पष्ट झालं.

आधी राज्यमंत्र्यांना ते ज्या विभागातून येतात, त्यापुरते अधिकचे अधिकार दिले जायचे. तशी पद्धत यावेळी आला असती, तर राज्यमंत्र्यांना किमान त्यांचा मतदारसंघ ज्या महसूल विभागात येतो, त्यापुरते तरी जास्तीचे अधिकार मिळाले असते. काही कॅबिनेट मंत्र्यांनी तर उच्च कोटीचा कंजूषपणा केला आहे. त्यांनी राज्यमंत्र्यांना ज्या विषयाचे अधिकार दिले, त्याबद्दल निर्णय घेण्यासाठी फाईल आपल्याकडेच येईल, असे आदेश काही कॅबिनेट मंत्र्यांनी काढले आहेत.मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्यांच्या राज्यमंत्र्यांना अन्य कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा जास्त अधिकार दिले आहेत. पण कॅबिनेट मंत्री मनाचा तेवढा मोठेपणा दाखवण्यास तयार नाहीत. त्यामुळे काही राज्यमंत्री याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.आशिष जयस्वाल, योगेश कदम, पंकज भोयर, इंद्रनील नाईक, मेघना बोर्डिकर, माधुरी मिसाळ असे सहा राज्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे हे मंत्री ज्या पक्षांचे आहेत, त्या पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्यांनीही त्यांना अधिकार देण्याचं औदार्य दाखवलेलं नाही. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल कोणतेही राज्यमंत्री जाहीरपणे बोलायला तयार नाहीत.धोरणात्मक निर्णयांची कोणतीही माहिती राज्यमंत्र्यांना दिली जात नाही. या विषयीच्या फायली राज्यमंत्र्यांकडून कॅबिनेट मंत्र्यांकडे आणि मग मुख्यमंत्र्यांकडे गेल्यास धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत राज्यमंत्र्यांनादेखील स्थान मिळू शकेल. पण तसं होताना दिसत नाही. राज्यमंत्री अभ्यासू असताना, ते आपापल्या विभागाच्या कामकाजात रस घेत असताना त्यांना अधिकार दिले जात नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनात नाराजीची भावना आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.