पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता शाहरुख खानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये पुणे, डोंबिवली आणि पनवेलमधील नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, संपूर्ण बॉलिवूड आणि मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.










