जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपरी-चिंचवडचे 32 पर्यटक अडकले आहेत. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पर्यटक भयभीत झाले असून, प्रशासनाकडे सुरक्षित घरी परतण्यासाठी मदतीची मागणी करत आहेत.जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारन व्हॅलीत 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील 32 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले आहेत. ज्यात रावेत आणि चिंचवड परिसरातील रहिवासी आहेत. आता त्यांच्याकडून मदत ही मागितली जात आहे.










