पती शेवटच्या घटका मोजत असतात विरह नको म्हणून पत्नीनेही इंद्रायणीच्या ढोहात घेतली जलसमाधी घेतली. नांदेडच्या चक्रवार दाम्पत्यावर एकाच सरणावर आळंदीत अंत्यसंस्कार करण्यात आले.कॅन्सरमुळे पती शेवटची घटका मोजत होता. हे लक्षात येताच पत्नीने देखील त्याचा विरह नको म्हणून, इंद्रायणी नदीत उडी घेऊन टोकाचं पाऊल उचललं. पत्नीनेही आत्महत्या करत आयुष्याची अखेर केली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मृत दाम्पत्य हे मूळ नांदेड येथील रहिवासी होतं. पण पुण्यात वास्तव्यास होतं. रविवारी पती – पत्नीच्या मृत्यूनंतर आळंदीत दोघांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.










