शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अडचणीत आले आहेत. त्यांच्यांवर लाखोंची पाणीचोरी केल्याचा आरोप करण्यात आला होतो. त्यानुसार त्यांच्या विरोधात कारवाईही करण्यात आली आहे.शिवसेना ठाकरे गटाचे अकोला जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय, पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी अकोटचे जलप्रदाय विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप गोपाल दातकर वर करण्यात आला होता. तर गोपाल दातकर यांनी २०१० पासून ४,९६,३१२ रुपयाचे पाणी चोरले असल्याचा आरोप त्यांच्या हिंगणी गावातील सरपंचांनी केला आहे. गोपाल दातकर यांनी १६० मी.मी.चा पाईप गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीला अवैधरीत्या जोडला असल्याचा आरोप आहे.
दातकर यांनी ही पाण्याची लाईन सुरु करुन स्वतःच्या घरात पाण्याचा वापर केला असल्याचं आरोप होत आहे.या अवैध पाणीचोरी बाबत सरपंच यांनी याआधी जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती तर तत्कालीन कार्यकारी अभियंता व उपअभियंता स्थळपाहणी करिता आले असता अवैध नळ कनेक्शन निदर्शनास आले होते मात्र गोपाल दातकर यांनी अरेरावी करुन सर्वाना तेव्हा हाकलून लावले होते असा आरोप सरपंचांनी केला आहे.अखेर हे अवैध कनेक्शन सदर पाईप व्यास टाकीच्या जवळ तोडून बंद करण्यात आले.अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अकोट येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या विरोधात अट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









