मुंबई पोलिसांचे ‘गणित’ जुळेना! दहा मिनिटांत घटनास्थळी न पोहोचल्याने ‘कारणे दाखवा’ नोटिसा.

विविध कारणांचे ‘अडथळे’ दूर करण्याऐवजी अधिकारी पोलिसांना विलंबाबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावत असल्याने मुंबई पोलिस दलामध्ये प्रचंड नाराजी आहे.एखादी घटना कळताच किंवा नियंत्रण कक्षाकडून कडून माहिती मिळताच पोलिसांनी दहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, वाहतूक कोंडी, एकापाठोपाठ एक कॉल, व्हीआयपी बंदोबस्त, पोलिस ठाण्यातील इतर कामांमुळे पोलिसांना वेळेचे हे गणित जुळवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, विविध कारणांचे ‘अडथळे’ दूर करण्याऐवजी अधिकारी पोलिसांना विलंबाबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावत असल्याने मुंबई पोलिस दलामध्ये प्रचंड नाराजी आहे.

मुंबई पोलिस दलातील १३ विभागांतील उपायुक्तांकडून सध्या दररोज पोलिस ठाण्यांमधून आढावा घेतला जात आहे. यामध्ये घटनास्थळी पोहोचण्यास दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेतलेल्या पोलिस पथकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली जात आहे.या नोटिशीद्वारे कारवाईचा इशारा, दंड ठोठावण्यात येत आहे. मुंबईतील अरुंद रस्ते, दुतर्फा असलेली पार्किंग, वाहनांची संख्यावाढ झाल्याने होणारी कोंडी, एकाच वेळी देण्यात येणारी अनेक कामे अशी अनेक कारणे विलंबामागे असतानाही अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात असल्याने पोलिस ठाण्यात जनरल ड्युटी करणारे, गस्ती वाहनावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी आहे.नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी सात ते दहा मिनिटांत पोहोचणे संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिसांना बंधनकारक आहे.

मात्र, पश्चिमेकडील पोलिस ठाण्याला पूर्वेकडील घटनेचा कॉल नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला, तर ते कसे वेळेत पोहोचतील? असा प्रश्न प्रत्यक्षात घटनास्थळी धावणारे पोलिस करीत आहेत. कोंडीतून सायरन वाजवून मार्ग काढता येईल, पण वाहनांची वेग वाढविण्याची क्षमता आहे का? हे अधिकाऱ्यांनी तपासायला हवे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात सात वाहने होती, मात्र सध्या बहुतांश पोलिस ठाण्यात वाहनांची संख्या कमी झाली आहे, असे समजते.कॉल मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचण्यासाठी दहा मिनिटांपेक्षा तीस सेंकद अधिक घेतली म्हणून संबंधित पोलिसांना ‘उशीर’ का? अशी विचारणा करण्यात आली. एखादे सिग्नलच जर तीन मिनिटांचे असेल तर अशा परिस्थितीत कोंडीत अडकलेले आमचे वाहन अपेक्षित वेळेत कसे पोहोचले ? याचा विचार कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी करायला हवा, असे एका कॉन्स्टेबलने सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.