रात्रभर अंधारात दोघांची वाट बघत चिमुरडी एकटीच बसली, ते परतलेच नाहीत, सकाळ होताच सर्वांना बसला धक्का.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली. रागाच्या भरात वादानंतर तरुण तरुणीनी डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात उड्या घेतल्या, स्मार्तपणे बेपत्ता झाले. येथील शोधकार्य सुरु असून पाण्याचा वेग कमी केल्यानंतर अधिक पुरेसा शोध घेण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस आणि गावकरी तैनात आहेत.पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून रागाच्या भरात एका तरुण तरुणीची डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात उडी घेतलीये. या घटनेत कविता सुनील पारधी आणि पप्पू लक्ष्मण खंडागळे अशी बेपत्ता झालेल्या दोघांची नावं आहेत. ही घटना विठ्ठलवाडी-टाकेवाडी परिसरात घडली आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास कविता पारधी, पप्पू खंडागळे आणि कविताची १३ वर्षांची मावस बहीण दिव्या राजाराम काळे हे तिघे दुचाकीवरून टाकेवाडी येथील ठाकर वाडीकडे निघाले होते. टाकेवाडीच्या डाव्या कालव्याजवळ आल्यानंतर कविता आणि पप्पू यांच्यात कुठल्यातरी कारणावरून भांडण झालं. रस्त्यावरच दोघांमध्ये वाद उफाळला.

यातुनच रागाच्या भरात कविताने कालव्यातील पाण्यात उडी घेतली. तिला वाचवण्यासाठी पप्पूनेही पाण्यात उडी मारली दोघांनाही पोहता येत असल्याने ते बाहेर येतील, असं दिव्याला वाटलं होत, मात्र, बराच वेळ झाला तरी दोघेही दिसले नाहीत. घाबरलेली दिव्या जवळच राहणाऱ्या रामदास भिमाजी चिखले यांच्या शेडमध्ये अंधारात जाऊन बसली. सकाळी शेतकरी रामदास चिखले शेडमध्ये आले असता त्यांना दिव्या दिसली. तिला विचारपूस केल्यानंतर तिने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर रामदास यांनी गावातील लोकांना माहिती दिली. गावाचे पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उडी घेतलेल्या ठिकाणापासून सात ते आठ किलोमीटरपर्यंत कालव्याची पाहणी केली, पण दोघांचा ठावठिकाणा लागला नाही.डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात सध्या ४०० क्युसेक्स वेगाने पाणी वाहत आहे. मोठ्या प्रवाहामुळे बेपत्ता दोघांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस. आर. मांडवे, संदीप कारभळ, पोलीस हवालदार संजय नाडेकर आणि पोलीस योगेश रोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गावाचे पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी मंचर पोलिसांना माहिती कळवली. शोधकार्य वेगाने सुरू असले तरी पाण्याचा वेग कमी झाल्याशिवाय यश मिळणं कठीण असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.मंचर पोलिसांनी घोडेगाव तहसीलदारांना पत्र देऊन कालव्यातील पाणी कमी करण्याची विनंती केली आहे. तहसील विभागाने डिंभे धरण प्रशासनाला पाणी कमी करण्याची सूचना दिली असून, लवकरच पाण्याचा वेग कमी केला जाईल. त्यानंतर शोधकार्याला गती येणार आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.