राज्यात कायदा व सुव्यवस्था चा बोजवारा बदलापूर, कोलकाता, घटना घुनास्पद :-गुलाबराव वाघ
धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर, गेल्या काही दिवसांत देशातील महिला लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणानंतर बदलापूरमधील शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील दोन चिमुकल्या विद्यार्थींनींवर लैंगिक अत्याचार झाल्याया घटनेने खळबळ उडाली आहे.त्याचा निषेधार्थ धरणगाव शहरातील नागरिक बंधू डॉक्टर पत्रकार राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित येत निषेध मोर्चाचे निवेदन देण्यात आले यावेळी धरणगाव कारणी दोन्ही घटनेची तीव्र शब्दांत मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या यावेळी प्रस्ताविक शिवसेना तालुका प्रमुख जयदीप पाटील यांनी सर्वप्रथम घटनेची सविस्तरपणे माहिती दिली शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात ३१ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर तिची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तरुणीचा ऑटोप्सी रिपोर्ट समोर आला आहे. तिच्या शरीरावर १४ पेक्षा अधिक जखमा आढळून आल्या आहेत. गळा दाबून संपवण्यापूर्वी तरुणीला मारहाण करण्यात आली. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. ऑटोप्सी रिपोर्टमध्ये पीडितेच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर, हातांवर, गुप्तांगासह शरीरावर १४ पेक्षा अधिक जखम केल्या तसेच बदलापूर येथे दोन चिमुकल्या वर लैगिक अत्याचारची घटनेचा निषेधार्थ असून आरोपी ला हे जेजे कृत्यच पाशवी, अमानवी आहे…त्याला शिक्षा तरी मानवी का असावी?” असा थेट प्रश्न गुलाबराव नी केला
तसेच काळा शर्ट परिधान करून शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, समाजातील अशा घटनांवर सरकारने आळा घातला पाहिजे तसेच यावेळी डॉ मिलिंद डहाळे, डॉ सूर्यवंशी, डॉ व्ही डी पाटील , डॉ अमृतकर, डॉ किशोर भावे, डॉ नरेंद्र पाटील, डॉ रमेश पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटांचे शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी संवेदना व्यक्त केल्या तसेच महिला आघाडी चा वतीने उषाताई वाघ यांनी यांनी नराधमांना तात्काळ फासावर लटकावले पाहिजे जनेकरून अस कृत्य करण्याचे धाडस केले नाही पाहिजे, तसेच शिंदे गटांचे बदलापूर नगराध्यक्ष वामन म्हात्रे नी घटनेच्या गांभीर्याने नसून महिला पत्रकार प्रश्न विचारल्यावर गलिच्छ भाषा वापरली राज्यात लाडकी बहिणी पेक्षा सुरक्षित बहीण वर भर द्यावा गृहमंत्री यांनी पदभार सांभाळत येत नसेल तर राजीनामा द्यावा असे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला, यावेळी महिला आघाडी चा जना आक्का पाटील रत्नाबाई धनगर, हेमांगी अग्निहोत्री शाळेत सखी सावित्री समिती स्थापन करावी ही मागणी करून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला
तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक जवळ घोषणा देऊन व काळे फिती बांधून घटनेचा निषेध व्यक्त करत धरणगाव पोलीस निरीक्षक पवन देसले यांना निवेदन देण्यात आले













