पारोळा तालुक्यासह एरंडोल विधानसभा मतदारसंघातील अन्य भागांत काल दिनांक २ एप्रिल रोजी गारपीट व अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील मक्का, ज्वारी, बाजरी, भुईमुंग, भाजीपाला पिके, फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पिकांवर लावणीपासून तर आज उभी असलेल्या पिकांवर शेतकऱ्यांनी काबाळ कष्ट करून, कसाबसा पैसा उभा करून शेती केली होती. सद्यस्थितीत शेतातून हि पिके काढून त्यांची विक्री करून आपला दैनंदिन उदरनिर्वाह हा बळीराजा भागवणार होता.

परंतु या गारपिटीसह अवकाळी पावसाने या बळीराजाच्या शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त केली. यामुळे शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.सदर नुकसान झालेल्या पारोळा तालुक्यातील करमाडसह परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन गारपिट व अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली व तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याकरिता लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. सदर नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करून. सदर आढावा आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे सादर करणार असून, शेतकऱ्यांना सदर नुकसानीचा संपूर्ण मोबदला मिळण्याचे संदर्भात प्रयत्न करणार असल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना ठोस आश्वासित केले.प्रसंगी देवगांव सरपंच समिर पाटील, तहसिलदार अनिल पाटील, करमाड सरपंच शरद पवार, गोपाल,पाटील, मुंदाणे सरपंच एकनाथ पाटील, आडगांव सरपंच महेश मोरे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.









