भूमिका घेता येत नाही अन् लांगूलचालनही..; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बावनकुळेंचा पलटवार.

वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली असताना मंत्री बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे.उद्धव ठाकरे यांनी वक्फ विधेयकावर आज पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. राजकीय पोळ्या भाजायचं विकृत राजकारण भाजप करत आहे. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे म्हणाले. तसेच अमेरिका, चीन या मुद्द्यावरही सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली होती. त्यावर मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे. भूमिका घेता येत नाही आणि लांगूलचालनही सोडता येत नाही अशी अवस्था तुमची झाली आहे. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी संजय राऊत यांचा उद्देश साध्य झाला असल्याचेही म्हटले आहे. ‘संजयराऊतप्रोटिझम’ असा उल्लेख यात केला आहे.

बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट मध्ये लिहिले की, अरे कहना क्या चाहते हो? उद्धव ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. निदान ते किती संभ्रमात, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत आहेत, याचे प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळाले.संजय राऊत यांचा उद्देश साध्य झालेला आहे. तुमचे ‘संजयराऊताप्नोटिझम’ आता पूर्ण झाले आहे. एकीकडे त्यांना साधी भूमिका घेता येत नाही आणि दुसरीकडे लांगूलचालनही सोडता येत नाही. करे तो करे क्या, अशी त्यांची अवस्था झालीय.अरे कहना क्या चाहते हो? असा उच्चार तुम्ही केलात, पण नेमका हाच प्रश्न महाराष्ट्राला, ही पत्रपरिषद ऐकल्यावर तुमच्या बाबतीत पडला आहे.विधेयक लोकसभेत पारित, राज्यसभेत चर्चा सुरूलोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी मांडले गेले. हे विधेयक लोकसभेत बहुमतांच्या आधारे पारित केले गेले. बिलाच्या समर्थनार्थ २८८ मत पडली तर विरोधात २३२ मते पडली. इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध केला होता. आज विधेयक राज्यसभेत मांडले गेले आहे. सध्या राज्यसभेत विधयेकावर चर्चा होत आहे. राज्यसभेत विधेयक पारित होण्यासाठी ११९ मतांची आवश्यक सरकारला आहे. सरकार सहयोगी पक्षांच्या आधारे बहुमत गाठू शकते. महाराष्ट्रातील सहकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाची मतेही त्यासाठी निर्णायक ठरणार आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.