नगरमध्ये लग्नाची सुपारी फुटली, पुण्यात होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेण्याची सुपारी दिली; लफडं लपवण्याचा घाट, नवरीने बॉयफ्रेण्डच्या साथीने गेम रचला.

 २७ फेब्रुवारी २०२५ ला मयुरीनं सागरला फोन केला. आपण सिनेमा बघायला जाऊया असं तिनं सागरला सांगितलं. सागरही तयार झाला. पुण्यात हडपसरच्या सीझन मॉलमध्ये दोघांनी सिनेमा बघितला. त्यानंतर सागरने मयुरीला तिच्या मामाच्या घरी खामगावला सोडलं.लग्न ठरलं, प्रीवेडिंग शूटही पार पडलं. मुलीने मुलाला सिनेमा बघण्यासाठी बोलावलं आणि नंतर त्याच्या हत्येचा कट रचला. क्राईम पेट्रोलचा एपिसोड असावा, असा हा सगळा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात घडलाय.नवरदेव सागर जयसिंग कदम, राहणार – जळगाव मही, तालुका कर्जत, जिल्हा – अहिल्यानगर. सागरचं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण झालंय, तो पुण्यात एका ठिकाणी नोकरीला आहे. तर नवरी मयुरी सुनील दांगडे, श्रीगोंदा, जिल्हा- अहिल्यानगर मयुरीला पोलीस बनायचं आहे, ती स्पर्धा परीक्षांची तयारी करते.दोघांचेही घरचे एकमेकांना भेटले. १२ मार्च २०२५ लग्नाची तारीखही काढली. सगळं कसं ठरल्याप्रमाणे होत होतं. दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू झाली होती. २४ फेब्रुवारीला दोघांनी प्री- वेडिंग शूट करण्याचं ठरवलं. पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये एकदम फिल्मी स्टाईल प्री- वेडिंग शूटही पार पडलं. मयुरी सागरसोबत खूश असल्याचं भासवत होती. लग्नाला १५ दिवसच उरले होते. पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं.

मयुरीनं एक प्लान आखला. २७ फेब्रुवारी २०२५ ला मयुरीनं सागरला फोन केला. आपण सिनेमा बघायला जाऊया असं तिनं सागरला सांगितलं. सागरही तयार झाला. पुण्यात हडपसरच्या सीझन मॉलमध्ये दोघांनी सिनेमा बघितला. त्यानंतर सागरने मयुरीला तिच्या मामाच्या घरी खामगावला सोडलं. तिथून बाईक घेऊन तो आपल्या घराकडे निघाला. खामगाव फाट्याजवळ सागरची बाईक पोहोचली. त्याच्यासमोर एक कार येऊन उभी राहिली. कारमधून काही तरुण बाहेर आले. त्यांच्या हातात दांडके होते.सागरला नेमकं काय घडतंय हे कळत नव्हतं. सागरला बाईकवरून खाली खेचत “तू मयुरीसोबत लग्न करू नकोस. मयुरीसोबत लग्न केलंस तर तुला संपवून टाकू” असं म्हणत दांडक्यानं मारहाण करायला सुरूवात केली. लाठ्या काठ्या दांडक्यांनी जबर मारहाण झाल्यानं सागर रस्त्यावरच पडला. काही वेळानंतर यवत पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं.

ही झाली घटना. पण हा कट रचला तो स्वतः मयुरीनं. मयुरीचे संदीप गावडे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्याला या कटात सामिल करून मयुरीनं सागरच्या हत्येचा प्लान आखला. मयुरी आणि संदीपनं सागरच्या हत्येची गुंडांना सुपारी दिली. सिनेमा बघून मयुरीला घरी सोडून माघारी निघालेल्या सागराला संदीप गावडे आणि गुडांनी खामगाव चौकात गाठलं.मयुरीसोबत लग्नाला का तयार झालास, मयुरीसोबत लग्न केलं तर तुला सोडणार नाही, असं म्हणत संदीप गावडेनं गुंडाना सागरचे हात पाय तोडायला सांगितलं. दांडक्यांनी जबर मारहाण झालेला सागर अर्धमेल्या अवस्थेत तिथेच पडला. या प्रकरणात यवत पोलिसांनी तपास सुरू केला. आणि पाच आरोपींना बेड्या ठोकल्या. गुन्ह्यातली मुख्य सूत्रधार मयुरी दांगडे ही महिनाभरापासून फरार आहे, तर तिचा प्रियकर संदीप गावडे याच्यासह आदित्य शंकर दांगडे, शिवाजी रामदास जरे, सूरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे अशा पाच जणांना अटक केली आहे.हे सर्व आरोपी अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.मयुरी नेमकी कुठे गेली आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. मयुरीला सागरसोबत लग्नच करायचं नव्हतं. तर ती तसं स्पष्ट सांगू शकत होती. पण इतरांच्या आणि घरच्यांच्या नजरेत तिला चांगलं राहायचं होतं. तुमच्या इच्छेनुसार मी लग्न करायला तयार आहे, असं दाखवण्याचा तिचा प्रयत्न होता. पण या सगळ्या प्रकरणात सागरसोबत मात्र वाईट घडलं.त्याचा जीव थोडक्यात वाचलाय. मयुरी महिनाभरापासून कुठे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. कदाचित मयुरी सापडल्यानंतर या प्रकरणाचा अधिक उलगडा होईल. समाजात हे असे प्रकार का घडताहेत, ही चिंतेची बाब.

  • Related Posts

    रात्रभर अंधारात दोघांची वाट बघत चिमुरडी एकटीच बसली, ते परतलेच नाहीत, सकाळ होताच सर्वांना बसला धक्का.

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली. रागाच्या भरात वादानंतर तरुण तरुणीनी डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात उड्या घेतल्या, स्मार्तपणे बेपत्ता झाले. येथील शोधकार्य सुरु असून पाण्याचा वेग कमी केल्यानंतर…

    रात्री जेवून खोलीत गेले आणि अचानक भयंकर आवाज…महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न.

    लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वतःवर गोळी झाडून घेतली. सुदैवाने यात ते बचावले असन लातूरच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लातूर शहर महानगरपालिकेचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रात्रभर अंधारात दोघांची वाट बघत चिमुरडी एकटीच बसली, ते परतलेच नाहीत, सकाळ होताच सर्वांना बसला धक्का.

    रात्रभर अंधारात दोघांची वाट बघत चिमुरडी एकटीच बसली, ते परतलेच नाहीत, सकाळ होताच सर्वांना बसला धक्का.

    रात्री जेवून खोलीत गेले आणि अचानक भयंकर आवाज…महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न.

    रात्री जेवून खोलीत गेले आणि अचानक भयंकर आवाज…महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न.

    सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत औषधी वाटप.

    सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत औषधी वाटप.

    ‘कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला.

    ‘कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला.