‘राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे समोर आले’, वक्फ विधेयकावरुन एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर वक्फ विधेयकावरुन टीका केली आहे. तसंच राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे समोर आल्याचंही ते म्हणाले.‘निवडणुकीत मुस्लीम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे बुधवारी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने समोर आले आहेत. बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सांगण्यानुसार वागणाऱ्या उबाठाची दुटप्पी भूमिका दिसली’, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली.‘सोयीचे राजकारण करणारे वक्फ बोर्ड विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही असे जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो. आता ते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात की राहुल गांधी सांगतील ते करतात हे पाहावे लागेल’, असेही शिंदे म्हणाले. ‘वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासंदर्भात शिवसेनेने यापूर्वीच स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतली आहे. आम्ही कधीही मतांसाठी सोयीचे राजकारण केले नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांसोबत आम्ही पुढे जात आहोत. आम्ही सत्तेसाठी विचारांशी कधीही तडजोड केली नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.‘काही मूठभर लोकांच्या हातात वक्फ बोर्डाची मालमत्ता ठेवण्यापेक्षा गरीब मुस्लिमांसाठी शाळा, रुग्णालये झाली पाहिजेत. हे विधेयक मुस्लीम समाजाच्या हिताचे आहे. या विधेयकाचे मुस्लिम समाजानेही स्वागत करायला हवे.

हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालते. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपतींच्या आदर्शावर देशाचे नेतृत्व करत आहेत. इथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना थारा नाही’, अशी टीकाही शिंदे यांनी केली.लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना राज्यातही त्यावरून राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर या विधेयकावरून टीका करण्यात येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि समाजवादी पक्षातील नेत्यांनी विधेयकावरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.‘संविधान सभेत नियम तयार होत असतानाच जमिनीचे काही विशेष अधिकार दिलेले आहेत.

मंदिर, प्रार्थनास्थळे यांना जमिनी दिल्या आहेत, इनाम जमिनी देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात छत्रपतींच्या वारसांनाही जमिनीचे विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. भाजपा सरकार वक्फ विधेयकाकडे धार्मिक नजरेने पाहून ती जमीन ताब्यात घेऊन उद्योगपती व बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहात का’, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला.‘भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात लोकांच्या धार्मिक मालमत्तेमध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज काय’, असा प्रश्न राष्ट्रवादी-शप पक्षाचे गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. ‘वक्फ म्हणजेच दानधर्मातून आलेल्या जमिनीवर कोणाचाही अधिकार नाही. सरकारने वक्फच्या जमिनींवर तिरक्या नजरेने बघू नये. कायदे असे करावेत की, वक्फच्या जमिनी सामाजिक कार्यासाठी वापरता येतील’, असे आव्हाड म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.