तळोदा येथील सर्फराज अश्फाक शेख याचा नुकताच साखरपुडा झाला होता. त्यामुळे त्याच्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.नुकताच साखरपुडा झाला, घरात लग्नाची तयारी सुरु होती, त्यातच रमजान ईद असल्याने मित्रांसोबत दर्शनासाठी निघालेल्या २२ वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. फोन करण्यासाठी एके ठिकाणी थांबले असताना वाळू भरलेल्या भरधाव डंपरने धडक दिली. यामध्ये युवकाच्या जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवार ३१ मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास नंदुरबार जिल्ह्यातील नळगव्हाण फाट्याजवळ घडली. जिथे लग्नाची वरात निघायला हवी होती, तिथे अंत्ययात्रा निघाली. यावेळी आई-वडिलांचा आक्रोश, कुटुंबीयांचे अश्रू मन हेलावून टाकणारे होते.
घरी ईद साजरी केल्यानंतर तळोदा येथील सर्फराज अशपाक शेख (वय २२ वर्ष) हा जाकीर मन्सूरी (वय २२) आणि शामीन याकूब खाटिक (वय २४) या दोघा मित्रांसमवेत दर्ग्याच्या दर्शनासाठी दुचाकी (एम.एच ३९ क्यू ०८३३) ने दुपारी २ वाजेच्या सुमारास अक्कलकुवा येथे जात होता. त्यावेळी फोनवर बोलण्यासाठी तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान असलेल्या नळगव्हाण फाट्याजवळ थांबले होते.त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दिली. अपघाताची तीव्रता एवढी होती की त्यात सर्फराज या तरुणाचा मांडीजवळील भाग अक्षरश पूर्णपणे चिरडला जाऊन त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेले दोघे तरुण गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी धाव घेतली.









