बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख यांना मारहाण केल्यावर ज्या महिलेच्या घरी नेण्यात येणार होतं, त्या महिलेची मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात ज्या महिलेच्या घरी त्यांना नेण्यात येणार होतं त्याच महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा मृतदेह घरात पडून असल्याने वास सुटला होता. त्यानंतर घराचे दार तोडून मृतदेह बाहेर काढला गेला. मात्रा आता संबंधित महिलेचा मृत्यू कसा झाला? तिची हत्या झाली का? हत्येमागे कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत महिलेबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. महिला एकावेळी पाच नावांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे.










