राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल दिसतो आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार काही भागांमध्ये आज गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर विदर्भात उष्णतेत वाढ होत आहे.गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पारा थेट ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाताना दिसतोय. मुळात म्हणजे मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाला पोषक असे वातावरण बघायला मिळतंय. होळीनंतर अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसतोय. आता भारतीय हवामान खात्याकडून मोठा इशारा देण्यात आलाय. राज्यातील काही भागांमध्ये आज गारपीटीचा थेट इशारा देण्यात आलाय. हवामान खात्याकडून गारपीटचा येलो अलर्ट देण्यात आलाय.
गारपीट होणार असल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात पारा हा वाढताना दिसत होता. मात्र, आता अवकाळीचे ढग कायम दिसत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळीचा फटका मागील काही दिवसांपासून बसताना दिसतोय. त्यामध्येच आता परत इशारा देण्यात आलाय.खरे संकट हे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. यासोबतच काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलीये. विदर्भात मात्र, उष्णता वाढताना दिसतंय.
चंद्रपूरच्या ब्रह्यपुरीत सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. अकोला आणि अमरावतीत देखील परिस्थिती सारखीच आहे.मुंबईमध्येही आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. दिवसभर तापमान सामान्य राहिल. जळगावमध्येही आज तापमान सामान्य राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. लातूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा काही ठिकाणी फटका बसला. चंद्रपूरमध्येही अवकाळी पाऊस झाल्याचे बघायला मिळाले. होळीनंतर वातावरणात बदल होत असून अवकाळी पाऊस हजेरी लावतोय. पुण्यात काल ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची नोंद झालीये. आज नांदेडमध्येही अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याची दाट शक्यता आहे. अवकाळी पावसाममुळे पिकांवर मोठे संकट आल्याचे चित्र आहे.









