नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होता
नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या या नुकसान झाल्यानंतर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल यासाठी विमा काढण्यात आला होता परंतु नुकसान झाल्यानंतर देखील विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मोबदला दिला नसल्याने खान्देश क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली आहे. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने अनेक नागरिक शेतीवर अवलंबून आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती शिवाय दुसरा काम धंदा नसल्याने शेतीवर उदरनिर्वाह केला जात असतो मात्र शासनाकडून मिळणाऱ्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे शासनाने मोठा गाजावाजा करत पीक विमा योजना सुरू केली आहे मात्र या योजनेच्या फायदा शेतकऱ्यांना मिळत नसणार तर ही योजना काय कामाची असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी खान्देश क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने केली आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत नाही मिळाली तर रस्त्यावर उतरण्याच्या इशारा देखील खान्देश क्रांती शेतकरी संघटनेने दिला आहे.










