विधानसभेत दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित होताच, भाजप नेते आक्रमक झाले. त्याचवेळी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.दिशा सालियन प्रकरणी विधानसभेत आज (२० मार्च) गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. यावेळी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या पाठीशी दोन आमदारांची ताकद उभी राहिल्याचे चित्र दिसले. दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी याचिका दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत आदित्य ठाकरे यांचे देखील नाव असून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सूरज पंचोली, दिनो मोर्यासह आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विधानसभेत दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित होताच, भाजप नेते आक्रमक झाले. त्याचवेळी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिशा सालियन प्रकरणात नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.”दिशा सालियन प्रकरणात ज्यावेळी सीआयडी तपास करत होती त्यावेळी त्या तपासात कोणत्याही राजकीय व्यक्तिचा सहभाग नव्हता. मी आदित्य ठाकरेंची पाठराखण करत नाही. परंतु तपासाअंती जे समोर आले ते मी सांगतोय” असे संजय गायकवाड म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जर कोणाकडे काही पुरावे असतील तर ते त्याच वेळी द्यायला हवे होते. परंतु कोणतेही पुरावे नसल्यामुळे आदित्य ठाकरेंना क्लिन चीट देण्यात आली होती. दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात इतक्या वर्षानंतर याचिका का दाखल करण्यात आली ? इतकी दिरंगाई का केली गेली? असे प्रश्न राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी सभागृहात उपस्थित केले. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन वातावरण भरकटवले जात आहे. हे महाराष्ट्र समोरचे प्रश्न नाहीत. असेही ते म्हणाले.
तर दुसरीकडे, रोहित पवार आदित्य ठाकरेंची पाठराखण करताना, “आदित्य ठाकरेंना मी जवळून ओळखतो. मला वाटतं कितीही काहीही केलं तरी आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असा मला विश्वास आहे” असे म्हणाले.









