वशिष्ठी नदी ठरतेय मृत्यूचा सापळा? पाच मुलं पोहायला नदीत, एकाचा दुर्दैवी अंत; भरतीच्या काळात आक्रीत घडलं.

 पोहण्याचा मोह जीवावर बेतू शकतो, अशा अनेक दुर्दैवी घटना समोर येत आहेत. अशाच काही घटनांमुळे होळी रंगपंचमीच्या सणाला गालबोट लागले आहे. अशातच चिपळूण शहरातील मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.पोहण्याचा मोह जीवावर बेतू शकतो, अशा अनेक दुर्दैवी घटना समोर येत आहेत. अशाच काही घटनांमुळे होळी रंगपंचमीच्या सणाला गालबोट लागले आहे. अशातच चिपळूण शहरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. चिपळूण शहरातील गोवळकोट मोहल्ला येथील अल्पवयीन तरुण तलहा मन्सूर घारे (वय १५) याचा वाशिष्टी नदीपत्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.चिपळूणमधील पाच जण वशिष्ठी नदीवर पोहायला गेले होते. इतक्यात दोन जण बुडू लागले. यामधील एकाला वाचवण्यात यश आलं मात्र एक जण बुडाला आहे. गोड कोट परिसरातील एका व्यक्तीने या मुलांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला अशी माहिती गोळकोट परिसरातील परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.

भरतीच्या काळात पाण्याचा अंदाज न आल्याने गोवळकोट वशिष्ठी नदीपात्रात तरुणासोबत आक्रीत घडलं. चिपळूण पोलीस निरीक्षक मेंगडे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक बोट चालकांच्या मदतीने जवळपास अर्ध्या तासानंतर मृतदेह शोधण्यात यश आले.तलहा मन्सूर घारे हा मुलगा आपल्या अन्य चार मित्रांसोबत वशिष्ठी नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेला होता. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला बुडताना पाहून त्याच्यासोबत असलेले इतर मित्र घाबरले.

त्यामुळे त्याला वाचवायला कोणी जाऊ शकले नाही. घाबरलेल्या अवस्थेत मदत मागितल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जवळच असलेल्या बोटी सोडून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळपास अर्ध्या तासानंतर त्याचा मृतदेह आढळला. या घटनेने गोवळकोट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.रंगपंचमीच्या शुभ पर्वावर साताऱ्यातील कराड शहरातून देखील दुर्दैवी घटना घडली आहे. एका क्लासचे विद्यार्थी बारावीची परीक्षा संपल्यानंतर रंगपंचमी साजरी करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी टेंभू येथील धरण परिसरात गेले होते. रंगपंचमी खेळता खेळता सहा जणांपैकी एक युवती पाय घसरून धरणातून सोडलेल्या कॅनॉलच्या पाण्यात पडली. यावेळी इतर विद्यार्थ्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याच्या प्रवाह वेगात असल्याने त्यांचे प्रयत्न फोल ठरले आणि ती वाहून गेली. जुहीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.