नागपूर हिंसाचारास कारणीभूत आक्षेपार्ह आणि भडकावू पोस्ट करणाऱ्या ‘त्या’ फेसबुक अकाऊंटचं location सापडलं.

नागपुरात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिक अवैधरीत्या वास्तव्यास आहेत. विशेषतः उत्तर आणि मध्य नागपूरच्या घनदाट वस्तीमध्ये ते मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे या घटनेत त्यांचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.नागपुरात सोमवारी(१७ मार्च) रात्री उसळलेल्या दंगलीच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. शहरात हिंसा भडकवण्यासाठी ज्या सोशल मीडिया अकाउंट्सचा वापर करण्यात आला, ते बांग्लादेशातून चालवले जात होते. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भडकाऊ पोस्ट नागरिकांमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी मुद्दाम पसरवल्या गेल्या होत्या. नागपूर शहर पोलीस आणि गुप्तचर विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, हिंसा भडकवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. या संदर्भात चार गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित अकाउंट्सची कसून तपासणी सुरू आहे.

सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीत सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आला. अनेक व्हाट्सअप ग्रुप आणि फेसबुक अकाउंट्सवरून एकाच समुदायाविरोधात भडकावू पोस्ट आणि अफवा पसरवल्या गेल्या.पोलिसांच्या सायबर शाखेने यासंदर्भात तपास केला असता, एका फेसबुक अकाउंटवरून अत्यंत आक्षेपार्ह आणि भडकावू पोस्ट करण्यात आल्याचे आढळले. या अकाउंटचा तपास केला असता तो बांग्लादेशातून नियंत्रित केला जात असल्याचे स्पष्ट झाले. या खुलाशामुळे पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, या हिंसाचारामागे आंतरराष्ट्रीय कट असण्याची शक्यता तपासली जात आहे.नागपुरात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिक अवैधरीत्या वास्तव्यास आहेत. विशेषतः

उत्तर आणि मध्य नागपूरच्या घनदाट वस्तीमध्ये ते मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे या घटनेत त्यांचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सोशल मीडियाद्वारे कोणत्याही प्रकारची अफवा किंवा हिंसक पोस्ट पसरवल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.या हिंसाचाराच्या घटनेनंतर सायबर शाखा, गुप्तचर विभाग आणि गुन्हे शाखा संयुक्तपणे तपास करत आहेत. नागपुरात अवैधपणे वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकांची नोंदणी करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असून, कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील शांतता अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.